शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रंथालयामुळे स्वास्थ्य : कदम

By admin | Updated: February 10, 2015 00:28 IST

रत्नागिरीत अधिवेशन : वार्षिक अधिवेशनात विविध ठराव

रत्नागिरी : गावातील सार्वजनिक ग्रंथालयांमुळे सर्वांना अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ तयार होते. वाचनातून विचारी आणि सृजनशील नागरिक घडतो आणि सार्वजनिक ग्रंथालय राबवत असलेल्या अवांतर उपक्रमातून, कवी संमेलन, आवडलेले पुस्तक परिसंवाद, लेखक - वाचक संवाद या कार्यक्रमातून समाज विकासाच्या विचारांना चालना मिळून, बळकट समाजाची निर्मिती होते, असे विचार आमदार संजय कदम यांनी मांडले.रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ३९ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी कदम बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे जर काही प्रश्न असतील, तर तेही मी सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फ त देण्यात येणारे उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अ. बा. वैद्य (दापोली), आनंद जाधव (लांजा) तर उत्कृ ष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार भक्ती कदम (दापोली) आणि विठोबा चव्हाण (राजापूर) यांना संजय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष झाल्याबद्दल कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनपर कार्यक्रमात प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाला जोडूनच नॅशनल हायस्कूल, लाटवणच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रंथालय प्रतीनिधींसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. व्यक्तिमत्व विकास या परिसंवादात ए. एच. इनामदार, शांता सहस्त्रबुद्धे, माधव गवाणकर हे सहभागी झाले होते. परिसंवादानंतर ग्रंथालय प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शंकासमाधान या कार्यक्रमात गायकवाड, ग्रंथालय अधिकारी, रत्नागिरी आणि श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह भाई कालेकर, मुरलीधर बोरसुतकर, श्रीकृष्ण साबणे, गजानन कालेकर, अ. बा. वैद्य, काशिनाथ चव्हाण, रमा जोग आदींनी सहभाग घेतला. अब्दुल कादिर अली खाचे यांनी आभार मानले. अधिवेशनासाठी जिल्ह्यातून १३० ग्रंथालय प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)