शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ग्रंथालयामुळे स्वास्थ्य : कदम

By admin | Updated: February 10, 2015 00:28 IST

रत्नागिरीत अधिवेशन : वार्षिक अधिवेशनात विविध ठराव

रत्नागिरी : गावातील सार्वजनिक ग्रंथालयांमुळे सर्वांना अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ तयार होते. वाचनातून विचारी आणि सृजनशील नागरिक घडतो आणि सार्वजनिक ग्रंथालय राबवत असलेल्या अवांतर उपक्रमातून, कवी संमेलन, आवडलेले पुस्तक परिसंवाद, लेखक - वाचक संवाद या कार्यक्रमातून समाज विकासाच्या विचारांना चालना मिळून, बळकट समाजाची निर्मिती होते, असे विचार आमदार संजय कदम यांनी मांडले.रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ३९ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी कदम बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे जर काही प्रश्न असतील, तर तेही मी सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फ त देण्यात येणारे उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अ. बा. वैद्य (दापोली), आनंद जाधव (लांजा) तर उत्कृ ष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार भक्ती कदम (दापोली) आणि विठोबा चव्हाण (राजापूर) यांना संजय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष झाल्याबद्दल कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनपर कार्यक्रमात प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाला जोडूनच नॅशनल हायस्कूल, लाटवणच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रंथालय प्रतीनिधींसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. व्यक्तिमत्व विकास या परिसंवादात ए. एच. इनामदार, शांता सहस्त्रबुद्धे, माधव गवाणकर हे सहभागी झाले होते. परिसंवादानंतर ग्रंथालय प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शंकासमाधान या कार्यक्रमात गायकवाड, ग्रंथालय अधिकारी, रत्नागिरी आणि श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह भाई कालेकर, मुरलीधर बोरसुतकर, श्रीकृष्ण साबणे, गजानन कालेकर, अ. बा. वैद्य, काशिनाथ चव्हाण, रमा जोग आदींनी सहभाग घेतला. अब्दुल कादिर अली खाचे यांनी आभार मानले. अधिवेशनासाठी जिल्ह्यातून १३० ग्रंथालय प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)