शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘निशाण’ची पातळी खालावली

By admin | Updated: February 28, 2016 00:56 IST

वेंगुर्ले शहरात टंचाई : एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वेंगुर्ले नगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. यापुढे पावसाळ्यापर्यंत तलावातील पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील कालावधीत पाणी कपातीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यातरी शहरात पाणीटंचाईची शक्यता नाही. वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत निशाण तलावातून शहरातील नागरिकांना दररोज ७ लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या ३० ते ४५ दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल एवढाच पाणीसाठा तलावामध्ये उपलब्ध आहे. शहरात ११०० नळ कनेक्शनधारक असून, ६२ सार्वजनिक शौचालयांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील बाजारपेठ, दाभोसवाडा, बंदर, किनळणे-भटवाडी या भागातील बहुतांशी नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील इतर भागात सार्वजनिक व वैयक्तिक विहिरींची संख्या जास्त आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहरातून जाणाऱ्या ओहळांवर ठिकठिकाणी नागरिकांनी नगर परिषदेच्या सहाय्याने बंधारे घातले असल्याने या विहिरींची पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. बाजारपेठेतील नळ कनेक्शनवर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांना या पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या दिवशी पाणी कपात असेल, त्यादिवशी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. कित्येक वर्षे शहरातील नारायण तलावाची दुरवस्था आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा निशाण तलावावर अवलंबून आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरवासीयांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते. नारायण तलावा संदर्भात नगर परिषदेकडून वेळोवेळी डागडुजीबाबत चर्चा, प्रस्ताव आदी सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. नारायण तलाव सुस्थितीत केल्यास शहराला कायमस्वरुपी मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी काटकसरीने वापरा : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले... निशाण तलावातून वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा केला जातो. या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असून, त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. आत्तापासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.