शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

‘निशाण’ची पातळी खालावली

By admin | Updated: February 28, 2016 00:56 IST

वेंगुर्ले शहरात टंचाई : एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वेंगुर्ले नगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. यापुढे पावसाळ्यापर्यंत तलावातील पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पुढील कालावधीत पाणी कपातीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यातरी शहरात पाणीटंचाईची शक्यता नाही. वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत निशाण तलावातून शहरातील नागरिकांना दररोज ७ लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या ३० ते ४५ दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल एवढाच पाणीसाठा तलावामध्ये उपलब्ध आहे. शहरात ११०० नळ कनेक्शनधारक असून, ६२ सार्वजनिक शौचालयांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील बाजारपेठ, दाभोसवाडा, बंदर, किनळणे-भटवाडी या भागातील बहुतांशी नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील इतर भागात सार्वजनिक व वैयक्तिक विहिरींची संख्या जास्त आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहरातून जाणाऱ्या ओहळांवर ठिकठिकाणी नागरिकांनी नगर परिषदेच्या सहाय्याने बंधारे घातले असल्याने या विहिरींची पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. बाजारपेठेतील नळ कनेक्शनवर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, व्यापारी यांना या पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या दिवशी पाणी कपात असेल, त्यादिवशी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. कित्येक वर्षे शहरातील नारायण तलावाची दुरवस्था आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा निशाण तलावावर अवलंबून आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरवासीयांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते. नारायण तलावा संदर्भात नगर परिषदेकडून वेळोवेळी डागडुजीबाबत चर्चा, प्रस्ताव आदी सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली गेलेली नाही. नारायण तलाव सुस्थितीत केल्यास शहराला कायमस्वरुपी मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी काटकसरीने वापरा : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले... निशाण तलावातून वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा केला जातो. या तलावातील पाण्याची पातळी कमी झाली असून, त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे. आत्तापासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.