शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करूया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 23:30 IST

नारायण राणे : बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कणकवलीत अभिवादन रॅली

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारत हा जगात आदर्श लोकशाही असलेला देश म्हणून लौकिकास पात्र ठरला आहे. त्यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून देशाला दिलेले विचार समानतेचे आहेत. हे विचार आपण आत्मसात करुन भारत देश महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कणकवली शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप बुद्ध विहार येथे करण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नारायण राणे बोलत होते.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, मधुसूदन बांदिवडेकर, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव प्रदीप सर्पे, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासमोर आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानामुळेच आदर्श लोकशाही येथे निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत. देशात समानता यावी म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वांनाच उपदेशात्मक आहे. असे असतानाच काही लोक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेब हे देशाच्या हितासाठी झटले. समानतेसाठी झटले हे विसरून चालणार नाही.बाबासाहेब म्हणजे दैवी शक्ती होती. उपेक्षित समाजाला, शिक्षणापासून दूर असलेल्या दलित समाजाला शिका आणि प्रगती करा असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे अनुयायी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात प्रगती करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या उपदेशाचा ते योग्य उपयोग करीत आहेत. हे चांगले आहे. आपणही बाबासाहेबांचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, असेही राणे म्हणाले.प्रास्ताविक संदीप कदम यांनी केले. तर आभार अंकुश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन बांदिवडेकर व राजेश कदम यांनी केले.यावेळी विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावरुन बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी झाले होते. (वार्ताहर)