शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करूया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 23:30 IST

नारायण राणे : बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कणकवलीत अभिवादन रॅली

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारत हा जगात आदर्श लोकशाही असलेला देश म्हणून लौकिकास पात्र ठरला आहे. त्यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून देशाला दिलेले विचार समानतेचे आहेत. हे विचार आपण आत्मसात करुन भारत देश महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कणकवली शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप बुद्ध विहार येथे करण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नारायण राणे बोलत होते.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, मधुसूदन बांदिवडेकर, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव प्रदीप सर्पे, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासमोर आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानामुळेच आदर्श लोकशाही येथे निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत. देशात समानता यावी म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वांनाच उपदेशात्मक आहे. असे असतानाच काही लोक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेब हे देशाच्या हितासाठी झटले. समानतेसाठी झटले हे विसरून चालणार नाही.बाबासाहेब म्हणजे दैवी शक्ती होती. उपेक्षित समाजाला, शिक्षणापासून दूर असलेल्या दलित समाजाला शिका आणि प्रगती करा असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे अनुयायी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात प्रगती करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या उपदेशाचा ते योग्य उपयोग करीत आहेत. हे चांगले आहे. आपणही बाबासाहेबांचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, असेही राणे म्हणाले.प्रास्ताविक संदीप कदम यांनी केले. तर आभार अंकुश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन बांदिवडेकर व राजेश कदम यांनी केले.यावेळी विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावरुन बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ सहभागी झाले होते. (वार्ताहर)