शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात विजय आमचाच, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला दावा

By सुधीर राणे | Updated: September 26, 2023 17:13 IST

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न' या अभियानाचे ...

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणारे 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न' या अभियानाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले आहे. ऑक्टोबर महिन्यात १ ते १२ ऑक्टोबर पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती या अभियानाचे निरीक्षक व शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा कोणीही करू देत. या लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील विजय आमचाच होणार असा दावा खोत यांनी केला. कणकवली येथील विजय भवन मध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते.  खोत म्हणाले, काळा पैसा भारतात आणणे, परदेशात पैसा घेऊन पळालेल्या काहींना भारतात परत आणणे यासह आधार लिंक करा, बँकेत पैसे जमा होतील, पॅन कार्ड लिंक करा, मग अनुदान जमा होईल अशी अनेक कामे करायला लावत जनतेच्या तोंडाला भाजप सरकारने पाने पुसली आहेत. याचा जाब विचारला जाणार असून या अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या लोकांना परत तुम्ही निवडून देणार आहात का? असा देखील प्रश्न विचारला जाणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे प्राबल्य आहे. त्यामुळे लोकसभेसह कणकवली विधानसभा मतदार संघावर देखील आम्ही विजय मिळवणार आहोत. असा दावा त्यांनी केला. मात्र, कणकवली मतदार संघात उमेदवार कोण? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळत पक्षप्रमुख त्याबाबत निर्णय घेतील असे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण