शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आमच्यावरील विश्वास २०१९ च्या निवडणुकीत दाखवून देऊ : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:49 IST

विश्वासाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत. आमच्या विश्वास यात्रेवर विरोधक टीका करत असून आमच्यावर विश्वास आहे की नाही हे आम्ही येत्या २०१९ च्या निवडणुकीत दाखवून देऊ असे प्रतिपादन

ठळक मुद्देमाझा माणूस उपाशी राहता नये, अशी आमची भावना आहे. आम्हाला साथ द्या. जिल्ह्याची, महाराष्ट्राची स्थिती बदलण्याची ताकद आमच्यात आहे.स्वाभिमानच्या विश्वास यात्रेस आचरा येथून प्रारंभ

सिंधुदुर्ग : विश्वासाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत. आमच्या विश्वास यात्रेवर विरोधक टीका करत असून आमच्यावर विश्वास आहे की नाही हे आम्ही येत्या २०१९ च्या निवडणुकीत दाखवून देऊ असे प्रतिपादन स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आचरा येथे केले. 

स्वाभिमानच्या विश्वास यात्रेचा शुभारंभ मालवण तालुक्यातील आचरा येथे झाला. खासदार राणे यांनी आचरा येथे श्री देव रामेश्वराला साकडे घालत भव्य रॅली काढत टेंबली हॉल येथे सभा झाली. यावेळी नीलम राणे, निलेश राणे, दत्ता सामंत, सतीश सावंत, संदीप कुडतरकर, रेश्मा सावंत, शशांक मिराशी, रणजित देसाई, संतोष साटविलकर, अशोक सावंत, मंदार केणी, राजू परुळेकर, बाबा परब, यतीन खोत, नीलिमा सावंत, प्रणिता टेमकर, जिज्या टेमकर, भाऊ हडकर, संतोष कोदे, विकास कुडाळकर, दीपक सुर्वे, जेरॉन फर्नांडिस, अवधूत हळदणकर, भाऊ हडकर, सतीश प्रभू, डॉ. प्रमोद कोळंबकर, सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, सुमेधा पाताडे व अन्य मान्यवर मोठया संख्येने हजर होते 

यावेळी राणे म्हणाले की सत्ताधाºयांनी विश्वास ठेवण्यासारख काय केले? ते दाखवा. शिवसेना-भाजपने कोणती कामे केली? रस्त्यांची काय परिस्थिती आहे? चार वर्षांपूर्वी कसे रस्ते होते? एक तरी प्रकल्प त्यांनी सुरू केला काय ? खासगी विमान उडविण्याचे नाटक केले. मी पाचशे कारखाने परवाना देऊन दोडामार्ग एमआयडीसी जाहीर केली. सत्ताधारी पांढºया पायाचे आहेत. विश्वासाची भाषा आमदार, खासदारांनी करू नये. आमदारांना जाब विचारायला हवा. आम्ही विकास केला ते लोक अनुभवत आहेतमच्छिमारांचा वापर मतांसाठी केलाआम्ही बोलतो तसं करतो. कोकणी जनता सुखी व्हायला पाहिजे. शिक्षण दर्जेदार मिळाले पाहिजे. विमानतळ सुरू झाल्यावर पायलट प्रशिक्षण देणार. पैसे कमवायला हॉस्पिटल नाही काढले. उपचार याच जिल्ह्यात व्हावेत यासाठी हॉस्पिटल काढले. मी उपक्रम सुरू केले त्यातील एकतरी उपक्रम स्वत:च्या पैशांनी विरोधकांनी काढावा. सत्ताधारी काय करू शकणार नाहीत. आम्ही जनतेला आधार देण्याचे काम करतो. मच्छिमारचा वापर आमदार आणि खासदार यांनी मतांसाठी केला. मच्छीमारांनी घाबरू नका. तुमची गाडी कोण अडवणार नाही. गाडी अडविली तर एकही गाडी येऊ देणार नाही. माझा माणूस उपाशी राहता नये, अशी आमची भावना आहे. आम्हाला साथ द्या. जिल्ह्याची, महाराष्ट्राची स्थिती बदलण्याची ताकद आमच्यात आहे. स्वाभिमानला साथ द्या. आम्ही कामे करून विश्वास दाखवून देऊ असेही राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे konkanकोकण