शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

बिबट्यांकडून पाच वर्षात तब्बल ११३ जनावरांवर झाला हल्ला

By admin | Updated: April 16, 2015 00:02 IST

राजापूर तालुका : जंगलतोडीच्या वाढत्या घटनांमुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढला वावर...

राजापूर : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारींमुळे बिबट्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाल्याने त्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११३ जनावरे मृत्युमूखी पडली आहेत. झालेल्या नुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत सुमारे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणांनी मृत्युमुखी पडल्याने त्यांची संख्या घटली आहे. भौगोलिक विस्ताराने मोठा असणारा राजापूर तालुका हा जंगलमय म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये बारसू, भू, कोतापूर, तळगाव, केळवली, ओणी, सौंदळ, ताम्हाणे, काजिर्डा, येरडव आदी परिसरात सातत्याने बिबटे आढळून आले आहेत. अलिकडच्या काळात सुरु असलेली वृक्षतोड व रात्रीच्या वेळी हौसेखातर होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्या यामुळे भक्ष्य शोधताना अडचण येत असल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळविला. त्यामुळे जंगली भागातच आढळणारे हे बिबटे मागील काही वर्षात भरवस्तीत आढळू लागल्याने प्रचंड घबराटीचे वातावरण कायम राहिले आहे.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी हल्ला करुन त्यांना ठार कल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील पाच वर्षात तालुक्यात ११३ पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडल्याची घटना घडली आहे. शिवाय या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यानुसार ११३ जनावरांच्या मालकांना गेल्या पाच वर्षात ३ लाख २१ हजार पाचशे एवढे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यामध्ये सन २०१० - २०११ या आर्थिक वर्षात बिबट्यानी आठ जनावरे मारली होती. त्यापोटी त्या शेतकऱ्यांना २२ हजार ६५० रुपये भरपाई पोटी मिळाले होते. सन २०११ - २०१२ मध्ये १८ मृत जनावरांच्या मालकांना ५१ हजार ७५० , सन २०१२ - २०१३मध्ये २१ मृत जनावरांच्या मालकांना ६३ हजार आठशे रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर सन २०१३ - २०१४ मध्ये बिबट्याने जोरदार दहशत माजवत तालुक्यातील ३८ जनावरांना फस्त केले होते. त्यावेळी नुकसान भरपाईपोटी १ लाख ३९ हजार ७०० रुपयांची आर्थिक भरपाई संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली. चालू वर्षात म्हणजेच सन २०१४ - २०१५ मध्ये एकूण २८ जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, संबधित मालकांना २६ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.याबाबत वनविभागाने तत्काळ दखल घेऊन वेळीच पंचनामे सादर केल्यामुळे मालकांना वेळेवर आर्थिक मदत मिळाली आहे. मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्यानी चांगलीच जरब बसवली असून, त्याच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण कायम आहे. मागील पाच वर्षामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडलेल्या तसेच शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले आहे. दुसरीकडे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणाने मृत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (प्रतिनिधी)बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली जनावरे व प्राप्त नुकसानभरपाईनुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई.मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्याची जरब.हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढतोय.फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी केला हल्ला.बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढले.