शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

बिबट्यांकडून पाच वर्षात तब्बल ११३ जनावरांवर झाला हल्ला

By admin | Updated: April 16, 2015 00:02 IST

राजापूर तालुका : जंगलतोडीच्या वाढत्या घटनांमुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढला वावर...

राजापूर : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारींमुळे बिबट्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाल्याने त्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११३ जनावरे मृत्युमूखी पडली आहेत. झालेल्या नुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत सुमारे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणांनी मृत्युमुखी पडल्याने त्यांची संख्या घटली आहे. भौगोलिक विस्ताराने मोठा असणारा राजापूर तालुका हा जंगलमय म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये बारसू, भू, कोतापूर, तळगाव, केळवली, ओणी, सौंदळ, ताम्हाणे, काजिर्डा, येरडव आदी परिसरात सातत्याने बिबटे आढळून आले आहेत. अलिकडच्या काळात सुरु असलेली वृक्षतोड व रात्रीच्या वेळी हौसेखातर होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्या यामुळे भक्ष्य शोधताना अडचण येत असल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळविला. त्यामुळे जंगली भागातच आढळणारे हे बिबटे मागील काही वर्षात भरवस्तीत आढळू लागल्याने प्रचंड घबराटीचे वातावरण कायम राहिले आहे.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी हल्ला करुन त्यांना ठार कल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील पाच वर्षात तालुक्यात ११३ पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडल्याची घटना घडली आहे. शिवाय या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यानुसार ११३ जनावरांच्या मालकांना गेल्या पाच वर्षात ३ लाख २१ हजार पाचशे एवढे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यामध्ये सन २०१० - २०११ या आर्थिक वर्षात बिबट्यानी आठ जनावरे मारली होती. त्यापोटी त्या शेतकऱ्यांना २२ हजार ६५० रुपये भरपाई पोटी मिळाले होते. सन २०११ - २०१२ मध्ये १८ मृत जनावरांच्या मालकांना ५१ हजार ७५० , सन २०१२ - २०१३मध्ये २१ मृत जनावरांच्या मालकांना ६३ हजार आठशे रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर सन २०१३ - २०१४ मध्ये बिबट्याने जोरदार दहशत माजवत तालुक्यातील ३८ जनावरांना फस्त केले होते. त्यावेळी नुकसान भरपाईपोटी १ लाख ३९ हजार ७०० रुपयांची आर्थिक भरपाई संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली. चालू वर्षात म्हणजेच सन २०१४ - २०१५ मध्ये एकूण २८ जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, संबधित मालकांना २६ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.याबाबत वनविभागाने तत्काळ दखल घेऊन वेळीच पंचनामे सादर केल्यामुळे मालकांना वेळेवर आर्थिक मदत मिळाली आहे. मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्यानी चांगलीच जरब बसवली असून, त्याच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण कायम आहे. मागील पाच वर्षामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडलेल्या तसेच शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले आहे. दुसरीकडे चार ते पाच बिबटे काही ना काही कारणाने मृत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (प्रतिनिधी)बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली जनावरे व प्राप्त नुकसानभरपाईनुकसान भरपाईपोटी त्यांच्या मालकांना सुमारे ३ लाख २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई.मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवणाऱ्या बिबट्याची जरब.हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांचा आकडादेखील वाढतोय.फासकीत अडकलेल्या एकून ९ बिबट्यांना वनविभागाने वाचवले.जंगलात चरावयास सोडलेल्या पाळीव जनावरांसह गोठ्यातील जनावरांवरही बिबट्यानी केला हल्ला.बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढले.