शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीची १५ ला सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 12:09 IST

जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग आणि देवगड या चारही नगरपंचायतीची सोडत १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ओबीसी लोकप्रतिनिधींना प्रत्येक नगरपंचायतीमध्ये १ जागा गमवावी लागणार आहे.

कुडाळ : ओबीसी प्रभागातील लोकप्रतिनिधींना आता नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये १ जागेचा फटका बसणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या आणि ज्यांची आरक्षणे जाहीर झाली होती. ती सर्व आरक्षणे रद्दबातल ठरवून नव्याने आरक्षणाची सोडत होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग आणि देवगड या चारही नगरपंचायतीची सोडत १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ओबीसी लोकप्रतिनिधींना प्रत्येक नगरपंचायतीमध्ये १ जागा गमवावी लागणार आहे.

आता नगरपंचायतीमध्ये १७ पैकी ४ जागा या ओबीसींसाठी असणार आहेत

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाने आदेश पारित केले आहे. आता होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हे आदेश लागू होणार असून ज्या नगरपंचायतीच्या आरक्षणाच्या सोडती झाले आहेत त्या रद्दबातल ठरवून पुन्हा या आरक्षण सोडती होणार आहे.

नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित होत्या या २७ टक्के प्रमाणे देण्यात आल्या होत्या. १७ जागांच्या २७ टक्के हे ४.५९ जागा येतात आदेशामध्ये २७ टक्क्यांपर्यंत अशी तरतूद असल्याने २७ टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही म्हणजेच ४.५९ करिता फक्त ४ जागा ओबीसीकरिता देता येणार आहेत त्यामुळे नगरपंचायतीच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात येणार असून आता १७ जागांपैकी ४ जागा या ओबीसींसाठी आरक्षित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया केल्याने ओबीसी प्रवर्गाला १ जागा गमवावी लागणार आहे.

एक महिला नगरसेवक होणार कमी

या ओबीसी आरक्षणाचा फटका फक्त त्याच प्रवर धरला बसला असं नाही तर ५० टक्के महिलांसाठी आरक्षणाच्या ठिकाणीसुद्धा हा फटका बसला आहे. १७ पैकी १२ जागा या सर्वसाधारण असणार आहेत त्यापैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील २ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यामुळे सर्व ८ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. यापूर्वी ९ जागा महिलांसाठी आरक्षित असायच्या, आता १७ पैकी ८ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. तर ९ जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित असणार आहेत.

ओबीसी महिलांसाठी दोन जागा

ओबीसी प्रवर्गासाठी आता चार जागा नगरपंचायतीमध्ये आरक्षित असून त्यापैकी दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहे त्यामुळे सर्वसाधारणमध्ये दोन जागा राहणार आहेत.

देवगडला पुन्हा आरक्षण सोडत होणार

देवगड नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी घेण्यात आली. मात्र, त्यानंतर शासनाचा नवा अध्यादेश आल्याने आता देवगडमध्येही पुन्हा आरक्षण सोडत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक