शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनारायण मिश्रा रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:38 IST

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची ...

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळलेले लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. बदलीचे आदेश बुधवारी दुपारी जिल्हा प्रशासनाकडे आले.सुनील चव्हाण यांनी दि. १४ आॅगस्ट २०१८ ला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. रत्नागिरीत येताच त्यांनी ‘मॉर्निंग वॉक’च्या माध्यमातून अनेक कार्यालयांना भेटी दिल्या. या कार्यालयांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच त्यांनी जिल्ह्यामध्ये स्वच्छता मोहीम पूर्णत्वाला नेली. थिबा राजवाड्याच्या दरुस्तीचे तसेच सुशोभीकरणाचे रखडलेले काम तसेच जिल्हा रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन येथील नादुरुस्त इमारतींचा प्रश्न मार्गी लावला.जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पीक कर्ज योजनेची गतवर्षी ११४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमातही गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उण्यापुºया दीड वर्षांच्या कालावधीत विविध यंत्रणांना सोबत घेऊन जास्तीत जास्त शासकीय योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकाचे, संस्था, संघटनांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा ते प्रयत्न करत असल्याने ‘जनाधार’ असलेले जिल्हाधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीत ओळख झाली आहे.चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीच्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने अल्पकाळात तिथे पोहोचत आपद्ग्रस्तांसाठी केलेले काय उल्लेखनीय आहे. काही दिवसांपूर्वीच ते मसुरी येथील महिन्याभराचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने त्यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. प्रशिक्षणाहून परत आल्यानंतरही आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत जावा, यासाठी विशेष प्रयत्नशील होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले. बदलीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. त्यांच्या जागी सन २०१६ ते २०१८ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेले आणि सध्या राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच तेही नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. मिश्रा यांनीही रत्नागिरीत दोन वर्षे काम केले असल्याने त्यांना जिल्ह्याची चांगली जाण आहे.