शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळला पुराचा धोका कायम

By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST

आंबेडकर नगरमधील समस्या : नदीपात्रालगत बांधकामांना परवानगी ठरतेय मारक

रजनीकांत कदम - कुडाळकुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीला दरवर्षी पूर येतो. नदीचे वाढलेले पाणी ज्या परिसरात पसरते त्याठिकाणी नवीन इमारतींची बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षी भंगसाळ नदीला पूर आल्यास पुराचे पाणी अन्यत्र पसरणार आहे. कुडाळ येथील बाबासाहेब आंबेडकर नगर येथील दहा ते बारा घरांना या पुराच्या पाण्याने काही दिवसांपूर्वी वेढा दिला होता. मात्र, पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने कोणतेही अघटीत घडले नाही. परंतु, पुन्हा रात्री अपरात्री पूर आल्यास ही घरे पाण्याखाली जाण्याचा धोका कायम आहे.भंगसाळ नदी कुडाळ शहराच्या बाजूने वाहत आहे. कुडाळ शहर भौगोलिकदृष्ट्या सखल व मैदानी प्रकारचे असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यास त्याचे पाणी कुडाळ शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पावशी, पिंगुळी व अन्य ठिकाणी पसरते. भंगसाळ नदीला पूर आल्यास महामार्गावरील वाहतूकही काही काळ बंदावस्थेत असते. याचा फटका कुडाळवासीयांनाच जास्त बसतो. कुडाळ तालुक्यात सुमार पाऊस असला आणि सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरिही भंगसाळ नदीला पूर येतो. त्यामुळे पूर केव्हा येईल, याबाबत शक्यता वर्तविता येत नाही. पुराचे पाणी शहरातील आंबेडकर नगर, भैरववाडी, मस्जिद मोहल्ला, लक्ष्मीवाडी, केळबाईवाडी तसेच अन्य ठिकाणी घुसते. यामध्ये आंबेडकर नगर वसलेल्या ठिकाणी शेतजमिनी असल्याने या नगराला जास्त धोका संभवतो.दरवर्षी पुराचे पाणी येत असे त्याठिकाणी शेतजमिनीच होत्या. त्यामुळे घरादारात पाणी घुसण्याचे प्रकार कमी होते. मात्र, सद्यस्थितीत ज्या शेतजमिनींमध्ये पुराचे पाणी पसरत असे त्याठिकाणीच नॉट अ‍ॅप्लिकेबल क्षेत्र मानून प्लॉटिंग करण्यात आले आहे. त्याठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. या जमिनीवर इमारती उभारणीसाठी यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.पुराच्या पाण्यामुळे शहरातील काही भागातील घरांना तडे गेले आहेत. तसेच पाणी घरात घुसून जमीन खचणे व सामानाचीही नुकसानी झाली आहे. यानंतरही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसून रहिवाशांनी घरांची तात्पुरती डागडुजी केली आहे. यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आल्याने पुराच्या पाण्यात मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. शासनाने अशा पूरग्रस्त भागातील नागरिकांकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, भर पावसात संसार उघड्यावर टाकून कोणीही स्थलांतर करत नाही. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.शासनाचा अजब कारभारपूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना शासन स्थलांतरीत होण्याचे सल्ले देते. परंतु, या नागरिकांची कोणतीही सोय शासन करत नाही. पूर्वापारपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगणारे शासन नदीपात्रालगतच्या भागांमध्ये इमारती बांधण्याची परवानगी का नाकारत नाही? पुराचे पाणी पसरणाऱ्या ठिकाणी इमारती बांधण्यास परवानगी शासनच देते आणि ते पाणी अन्यत्र घुसल्यास त्याची जबाबदारीही टाळते, असा शासनाचा गोंधळात टाकणारा कारभार सुरु आहे.-पुराचे पाणी पसरणाऱ्या क्षेत्रात नव्याने बांधकामे करण्यात येणार आहेत.-जमीन मालकांनी या ठिकाणी उंच भाग करण्यासाठी मातीचा भराव टाकला आहे.-यामुळे या परिसरात पाणी येण्याचे प्रमाण कमी होणार आहे.-मात्र, पूरस्थितीमध्ये याठिकाणी जे पाणी पसरत असे त्या पाण्याचा प्रवाह बदलणार असून पुराचे पाणी अन्यत्र नागरिकांच्या वस्तीत घुसणाच्या संभव आहे.-नदीपात्राजवळ वाढत जाणाऱ्या बांधकामांमुळे आंबेडकर नगराला धोका निर्माण झाला आहे.४पुराच्या पाण्यामुळे यावर्षी मुसळधार पावसात येथील काही घरांना पाण्याने वेढा दिला होता. ४काही घरातील माणसांनी सामानाची बांधाबांध करत स्थलांतराची तयारी ठेवली होती. -मात्र, काहीवेळाने पाऊस थांबल्याने पाणी ओसरले.-येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, पावसाळ्यात पुन्हा पुराची स्थिती निर्माण झाल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती कायम आहे. -या वस्तीतील नागरिकांनी पूर आल्यास काय करावे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.