शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कोकण झोनमध्ये वर्षभरात २१ फिडर्सची वाढ

By admin | Updated: September 15, 2014 23:22 IST

महावितरण कंपनी : अ ते ड गटात फिडर्सची वर्गवारी

रत्नागिरी : कोकण झोनमध्ये वर्षभरात महावितरणच्या २१ फिडर्सची वाढ झाली आहे. गतवर्षीपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१ फिडर्स होते. सध्या त्यांची संख्या २२२ इतकी झाली आहे. मात्र, सर्वच्या सर्व फिडर्सची वर्गवारी ‘अ’ ते ‘ड’ गटात असून, अद्याप भारनियमनाचा धोका टळला आहे.महावितरणकडून गेली दोन वर्षे फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. ज्या फिडर्सवर वीज गळती अधिक शिवाय आर्थिक वसुली कमी आहे, त्या फिडर्सची अ ते ग-३ पर्यंत वर्गवारी करण्यात आली आहे. या गटाप्रमाणे निश्चित तासांचे भारनियमन सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अ, ब, क, ड गटात फिडर्सची वर्गवारी करण्यात आली आहे. मार्च २0१३ मध्ये एकूण २०१ फिडर्स होते, त्यामध्ये गेल्या दीड वर्षात २१ फिडर्सची भर पडली आहे. त्यामुळे २२२ इतकी फिडर्सची संख्या झाली आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७९ फिडर्स ‘अ’ गटात आहेत. ७१ फिडर्स ‘ब’ गटात, ६१ फिडर्स ‘क’ गटात, तसेच ११ फिडर्स ‘ड’ गटात आहेत. ‘ड’ गटातील फिडर्सची संख्या अल्प आहे. इ गटापासून भारनियन करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फिडर्स भारनियमनापासून अलिप्त आहेत. त्यामुळे कोकण विभागाचा ठोका तात्पुरता टळला आहे.महावितरणच्या फिडर्सनिहाय भारनियमनाला ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला लाभत आहे. शिवाय महावितरणकडून वीज गळती रोखण्यासाठी विशेष भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. फिडर्सनिहाय आढावा घेऊन वीज गळती, चोरी शोधण्यात येते. शिवाय संबंधित ग्राहकांकडून दंडही वसूल करण्यात येतो. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठीही पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.एकूणच महावितरणने फिडर्सनिहाय वर्गवारी केल्याने ग्राहकांनाही त्यापासून दिलासा मिळाला आहे. सरसकट होणाऱ्या भारनियमनातून मुक्त झाले आहेत. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सरसकट भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु फिडर्सनिहाय भारनियमनामुळे ग्राहक सुखावले आहेत. (प्रतिनिधी)