शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

येत्या पाच वर्षांत कोकणचा कायापालट

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

अनंत गीते : करंजाणी येथील नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी घोषणा

दापोली : येत्या पाच वर्र्षात आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणाच्या आर्थिक विकासाकरिता आवश्यक असणारे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व जलमार्ग यांचे जाळे तयार करणार असून, यानंतर कोकणाचा वेगाने अर्थिक विकास होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केली. तालुक्यातील करंजाणी येथील ग्रामपंचायत कार्यालय व श्री शिवाजी हायस्कूल, करंजाणी नूतन इमारत भूमिपूजन सोहळा अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे उपस्थित होते. कोकणच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा झाली असून, आपणाला योग्य जागा उपलब्ध झाली की, तत्काळ या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे दापोलीला वेगळी ओळख निर्माण होईल. विनाअनुदानित शाळांना खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देता येत नव्हता. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना आपण याबाबत विशेष प्रयत्न करून विनाअनुदानित शाळांकरिताही त्यांना अधिक गरज असल्याने खासदार निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सध्याचे शिक्षण हे रोजगाराभिमुख असावे. ग्रामीण भागात असणाऱ्या कौशल्यांना मान्यता व प्रतिष्ठा मिळायला हवी. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलेपमेंट मंत्रालय सुरू केले आहे. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. खेडोपाडी शिक्षणाचे कार्य करणाऱ्या सर्वच शिक्षण संस्थांना आपले नेहमीच सहकार्य होत आले असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्र्रमुख शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, उपसभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी गोलांबडे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, उपसंघटक चंद्रकांत शिगवण, पंचायत समिती सदस्य श्रीपत पवार, रत्नागिरी जिल्हा नियोजन सदस्य विनायक गायकवाड, उपविभागप्रमुख सुभाष कांगणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दापोलीत मेरिटाईम विद्यापीठ होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अवजड व उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी केली. यामुळे दापोलीचे महत्त्व अधिक वाढणार असून, दापोली हे महाराष्ट्रातील परिपूर्ण शिक्षण केंद्र म्हणून भविष्यात ओळखले जाईल.खेडचा नाच्या पोर : सूर्यकांत दळवीसूर्यकांत दळवी यांनी आमदार संजय कदम यांच्यावर ‘खेडचा नाच्या पोर’ म्हणून सडकून टीका केली. त्याचा पगार किती व तो बोलतो किती ? त्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आता खालसा झाली असून, युती शासनाची सत्ता आली आहे. तरीही तो भूमिपूजनांचे नारळ फोडत सुटला आहे. आयजीच्या जिवावर बायजी उदार... अशी त्याची गत झाली असल्याचे ते म्हणाले.