शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:39 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्याप्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय 

कणकवली : प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या 'समर स्पेशल ' गाड्यांमध्ये (०१०५१/५२ )ही गाडी १७ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजता २० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २४ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.दुसरी गाडी(०१०१६/१५) करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १८ मे ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी करमाळीहून दर शनिवारी १२.५०वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.तिसरी विशेष गाडी (०१०४५/४६) १२ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता ती गोवा- करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून दर शुक्रवारी दुपरी १२.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ती लोकमान्य टर्मिनसला पोहोचेल.चौथी विशेष गाडी(०१०३७/३८) ही ८ एप्रिल ते ३जून २०१९ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. ही गााडी दर सोमवारी रात्री १ वाजता १०मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी ती १ वाजता २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. सतरा डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, या समर स्पेशल जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्टी साठी गावी येणाऱ्या मुंबईकर मंडळींना गर्दीच्या हंगामात त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग