शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:39 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्याप्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय 

कणकवली : प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या 'समर स्पेशल ' गाड्यांमध्ये (०१०५१/५२ )ही गाडी १७ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजता २० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २४ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.दुसरी गाडी(०१०१६/१५) करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १८ मे ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी करमाळीहून दर शनिवारी १२.५०वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.तिसरी विशेष गाडी (०१०४५/४६) १२ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता ती गोवा- करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून दर शुक्रवारी दुपरी १२.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ती लोकमान्य टर्मिनसला पोहोचेल.चौथी विशेष गाडी(०१०३७/३८) ही ८ एप्रिल ते ३जून २०१९ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. ही गााडी दर सोमवारी रात्री १ वाजता १०मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी ती १ वाजता २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. सतरा डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, या समर स्पेशल जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्टी साठी गावी येणाऱ्या मुंबईकर मंडळींना गर्दीच्या हंगामात त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग