शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ‘रामभरोसे’च

By admin | Updated: November 11, 2014 23:19 IST

सुरक्षेची हमी नाही : ‘लोकमत’ने दिले होते सात दिवसांपूर्वीच संकेत

रजनीकांत कदम - कु डाळ -वारंवार पटरी सोडून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या सतत अपघात होण्याच्या कारणांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्क व्हावे, असे सावधानतेचे आणि जागृकतेचे वृत्त अवघ्या सात दिवसांपूर्वी येऊनही कोकण रेल्वे प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेच्यासंदर्भात गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. या कारभारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस नुकतीच एका मोठ्या अपघातापासून वाचली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सध्यातरी ‘रामभरोसे’ असून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने सर्व गाड्यांचा वेग वाढविला आहे. गेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या मार्गावरील पाच रेल्वे अपघात पटरीवरून ट्रेन घसरल्यामुळे झाले. यापैकी चार मालगाड्या होत्या. तर एक सावंतवाडी-दिवा पॅसेंजर होती. या पाच अपघातात सुमारे १८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तर अनेक प्रवाशांना रेल्वे खोळंबल्याने त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वे पटऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. प्रशासनामध्ये गांभीर्य नाहीकोकण रेल्वे मार्गावरून रेल्वे का घसरतात, याबाबत कोकण रेल्वे प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वे सुरक्षेसंदर्भात उपाययोजना न केल्यास प्रवास धोक्याचा होण्याच्या इशाऱ्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, याला सात दिवस होत नाहीत, तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लाजूळ आणि करबुडे बोगदा दरम्यान रेल्वेच्या रुळाला चार इंच तडा गेल्याचे निदर्शनास आले. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या सकाळी साडेसातच्या सुमारास ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी काही वेळातच तिथून जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला त्या ठिकाणाहून अवघ्या ३०० मीटर अंतरावर थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने हा अपघात टळला असला, तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जनतेला रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षायोगायोगाने कोकण भूमीचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सध्या देशाचे रेल्वेमंत्री झाले आहेत. त्या अगोदरचे रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी रेल्वेचे स्वप्न साकार केले. आता कोकण रेल्वेच्या सुरक्षेकरिता व प्रवाशांच्या निर्धोक, सुखकर प्रवासाकरिता रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून कोकणवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. निदान आता तरी कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील अशी आशा कोकणातील जनता बाळगून आहे. प्रत्यक्षात त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.अपघाताची भीतीगेल्या काही महिन्यात कोकण रेल्वेला पाच अपघात झाले. तर हा सहावा अपघात सुदैवाने टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तरी रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रवाशांच्या मनात अपघाताबाबत भीती निर्माण झाली आहे.अनेक आव्हाने पेलून, दरीडोंगर, नद्यानाले ओलांडून, भुयार पार करून आलेल्या कोकण रेल्वेला आतापर्यंत निसर्गाने साथ दिलेली आहे.परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या मनातील भीती दूर होईल.