शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ‘रामभरोसे’च

By admin | Updated: November 11, 2014 23:19 IST

सुरक्षेची हमी नाही : ‘लोकमत’ने दिले होते सात दिवसांपूर्वीच संकेत

रजनीकांत कदम - कु डाळ -वारंवार पटरी सोडून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या सतत अपघात होण्याच्या कारणांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्क व्हावे, असे सावधानतेचे आणि जागृकतेचे वृत्त अवघ्या सात दिवसांपूर्वी येऊनही कोकण रेल्वे प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेच्यासंदर्भात गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. या कारभारामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस नुकतीच एका मोठ्या अपघातापासून वाचली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा सध्यातरी ‘रामभरोसे’ असून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेने सर्व गाड्यांचा वेग वाढविला आहे. गेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या मार्गावरील पाच रेल्वे अपघात पटरीवरून ट्रेन घसरल्यामुळे झाले. यापैकी चार मालगाड्या होत्या. तर एक सावंतवाडी-दिवा पॅसेंजर होती. या पाच अपघातात सुमारे १८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तर अनेक प्रवाशांना रेल्वे खोळंबल्याने त्रास सहन करावा लागला. तसेच रेल्वे पटऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. प्रशासनामध्ये गांभीर्य नाहीकोकण रेल्वे मार्गावरून रेल्वे का घसरतात, याबाबत कोकण रेल्वे प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वे सुरक्षेसंदर्भात उपाययोजना न केल्यास प्रवास धोक्याचा होण्याच्या इशाऱ्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, याला सात दिवस होत नाहीत, तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लाजूळ आणि करबुडे बोगदा दरम्यान रेल्वेच्या रुळाला चार इंच तडा गेल्याचे निदर्शनास आले. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅकमॅन सचिन पाडावे यांच्या सकाळी साडेसातच्या सुमारास ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी काही वेळातच तिथून जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसला त्या ठिकाणाहून अवघ्या ३०० मीटर अंतरावर थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने हा अपघात टळला असला, तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार केला नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जनतेला रेल्वे मंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षायोगायोगाने कोकण भूमीचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सध्या देशाचे रेल्वेमंत्री झाले आहेत. त्या अगोदरचे रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी रेल्वेचे स्वप्न साकार केले. आता कोकण रेल्वेच्या सुरक्षेकरिता व प्रवाशांच्या निर्धोक, सुखकर प्रवासाकरिता रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून कोकणवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. निदान आता तरी कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील अशी आशा कोकणातील जनता बाळगून आहे. प्रत्यक्षात त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.अपघाताची भीतीगेल्या काही महिन्यात कोकण रेल्वेला पाच अपघात झाले. तर हा सहावा अपघात सुदैवाने टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तरी रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रवाशांच्या मनात अपघाताबाबत भीती निर्माण झाली आहे.अनेक आव्हाने पेलून, दरीडोंगर, नद्यानाले ओलांडून, भुयार पार करून आलेल्या कोकण रेल्वेला आतापर्यंत निसर्गाने साथ दिलेली आहे.परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या मनातील भीती दूर होईल.