शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

कोकण रेल्वेवरील विघ्न कायम

By admin | Updated: August 28, 2014 23:15 IST

भक्तांचे हाल सुरूच : दादर पॅसेंजर पाच तास उशिरा

रत्नागिरी/खेड : करंजाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा ट्रॅक अद्यापही जॅम आहे. अशातच पावसाचा व्यत्यय आणि गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सोयीच्या दृष्टीने म्हणून कोकण रेल्वेकडून केले जाणारे सर्व प्रयत्न पूर्णपणे फलदायी ठरलेले नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या वगळता आज, गुरुवारी पाचव्या दिवशीही वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत.करंंजाडी स्थानकातील मुख्य रुळांचे काम अद्यापही सुरू आहे. पावसामुळे या कामात व्यत्यय येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, हे काम अव्याहतपणे सुरू असून, कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचे हाल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेले दोन-तीन दिवस गाड्या १0 ते १५ तास उशिराने धावत होत्या. आज पाचव्या दिवशी मात्र यामध्ये काहीसा फरक पडला आहे. तथापि, वेळापत्रक अजूनही पूर्णपणे रुळांवर आलेले नाही. अजूनही गाड्या एक ते पाच तास विलंबाने धावत आहेत. (प्रतिनिधी)