शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

जलवाहतुकीसाठी कोकण - विकास आघाडीचे साकडे

By admin | Updated: July 28, 2014 23:14 IST

गणपत चव्हाण - महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती

कणकवली : मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पश्चिम किनारी सागरी महामार्ग पूलासहित पूर्ण करावा आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर जलवाहतुक सुरू करावी या प्रमुख तीन मागण्यांचे निवेदन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केंद्रीय सार्वजनिक दळणवळण-जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले आहे. अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.मुंबई-गोवा या अरूंद महामार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वळणावळणाचा, चढउतार डोंगरघाट आणि ब्रिटीशकालीन अरूंद पुल यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांमुळे या महामार्गाची वाताहात झाली आहे, चिपळूणनजीकचा कशेडी घाट खूप धोकादायक झाला आहे. त्यामुळे या घाटाला पर्यायी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. राज्यातील पुणे-बेंगलोर मार्गामध्ये कात्रज घाट ते खंबाटकी घाट वगळण्यासाठी बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कशेडी घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्यात यावा. या पर्यायी मार्गामुळे गोव्यापर्यंतचे अंतर ६० किलोमीटर कमी होणार आहे. आता या महामार्गाला प्राधान्य देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्ग देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील लोकसभेत हे जाहीर करण्यात आले. मात्र या मार्गाचे बांधकाम संथगतीने चालले आहे. गेले २५ वर्षे या मार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती आहे. आगामी दहशतवादी हल्ले समुद्रमार्गे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गेली ३० वर्षे किनाऱ्यावरील प्रवासी बोट वाहतुक बंद आहे. जलवाहतुक सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)