शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जलवाहतुकीसाठी कोकण - विकास आघाडीचे साकडे

By admin | Updated: July 28, 2014 23:14 IST

गणपत चव्हाण - महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती

कणकवली : मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पश्चिम किनारी सागरी महामार्ग पूलासहित पूर्ण करावा आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर जलवाहतुक सुरू करावी या प्रमुख तीन मागण्यांचे निवेदन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी केंद्रीय सार्वजनिक दळणवळण-जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना सादर केले आहे. अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.मुंबई-गोवा या अरूंद महामार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वळणावळणाचा, चढउतार डोंगरघाट आणि ब्रिटीशकालीन अरूंद पुल यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांमुळे या महामार्गाची वाताहात झाली आहे, चिपळूणनजीकचा कशेडी घाट खूप धोकादायक झाला आहे. त्यामुळे या घाटाला पर्यायी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. राज्यातील पुणे-बेंगलोर मार्गामध्ये कात्रज घाट ते खंबाटकी घाट वगळण्यासाठी बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कशेडी घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्यात यावा. या पर्यायी मार्गामुळे गोव्यापर्यंतचे अंतर ६० किलोमीटर कमी होणार आहे. आता या महामार्गाला प्राधान्य देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्ग देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मागील लोकसभेत हे जाहीर करण्यात आले. मात्र या मार्गाचे बांधकाम संथगतीने चालले आहे. गेले २५ वर्षे या मार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या समुद्रकिनारी सुमारे ४० लाख कोकण वस्ती आहे. आगामी दहशतवादी हल्ले समुद्रमार्गे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गेली ३० वर्षे किनाऱ्यावरील प्रवासी बोट वाहतुक बंद आहे. जलवाहतुक सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)