शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

कोळकेवाडी कार्यालयाचे स्थलांतर?

By admin | Updated: February 13, 2015 22:55 IST

स्थानिकात खळबळ : शासनाने पाठपुरावा करणारी समिती स्थापन

शिरगाव : महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी कोयना नदीची महती सांगत कोयना जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. धर पायथा वीजगृह वगळता पोफळी, कोळकेवाडी येथे ७५ टक्के कामे रत्नागिरी जिल्ह्याातील चिपळूण तालुक्यात सुरु असताना, जलसंपदा खात्याकडून वीजनिर्मिती वगळता इतर शासकीय कार्यालये बिनकामाची ठरवण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेले कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाच बंद करुन माणगाव जिल्हा रायगड येथे नेण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याच्या वृत्ताने अलोरेत खळबळ उडाली आहे.१९६७ साली तत्कालीन पाटबंधारे खात्याकडून स्थापत्य, विद्यत व यांत्रिकी विभागाची कार्यालय सुरु झाले. जलविद्युत प्रकल्पासाठी वीजगृह उभारणी, धरण व्यवस्थापन व वसाहत दुरूस्ती व वीज पुरवठा याबरोबरच कोकणचे यांत्रिकी विभागीय अर्थशास्त्र अलोरेत आज सुरु आहेत. कोयना प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प असल्याने आजपर्यंत इथे विविध उपविभाग कार्यरत आहेत.सद्यस्थितीत येथील मनुष्यबळ अन्यत्र हलवल्यास २५० कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. मुबलक पाणी, वसाहत अंतर्गत रस्ते, पथदीप, बाजारपेठ, शाळा, पोष्ट, बँका या मुलभूत सुविधा असलेले अलोरे गावातील प्रकल्पग्रस्तांचे उद्योगधंदे अडचणीत येऊ शकतात अशी स्थिती आहे. जलसंपदा खात्याचा प्रस्तावित नांदिवसे-स्वयंदेव येथील प्रकल्पाचे काम या विभागाकडून होऊ शकते. पायाभूत सुविधा असलेल्या शासन संपादित जमिनीत शासन अन्य कोणताही उद्योग येथे आणू शकते. अतिवृष्टीमुळे कुंभार्ली-नवजाघाट बंद असताना, येथे राहणारे मनुष्यबळ महत्वाचे ठरते. अशा अनेक मुद्यांवर वेगाने चर्चा घडू लागल्या आहेत. सिंधुदुर्गातील आरोस नगरीप्रमाणे अलोरेत शासकीय यंत्रणा उभी राहू शकते. या अनुषंगाने स्थानिक मडळींनी चर्चेतून प्रशासकीय स्तरावर या धोरणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची मांडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.कोळकेवाडी नागावे-अलोरे-पेढांबे, पोफळी-कोंडफणसवणे गावातील शासकीय स्थानिक कर्मचाऱ्यांनाही उतारवयात त्रासदायक ठरणारा शासन निर्णय रद्द व्हावा व इथेच अधिक काम द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.पन्नास वर्षानंतर आलेल्या या धक्कादायक बातमीमुळे समांतर समस्या केंद्रस्थानी सर्वपक्षीय क्रीयाशील कार्यकर्ते एकवटले आहेत. प्रकल्प बचाव कृतीसमिती स्थापित करून प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याच्यादृष्टीने एकमताने पेढांबेतील प्रताप शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत विनो झगडे, रमेश राणे, मयूर खेतले, सुर्यकांत खेतले, घनश्याम पालांडे, प्रकाश मोहिते, चंद्रकांत राणे, रमेश बंगाल यांचा समितीत समावेश आहे. प्राथमिक सभेला ४० स्थानिक मंडळी उपस्थित होती. या सर्व विषयाकडे अधिक गांभिर्याने पहावे लागेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कोळकेवाडी विभाग बंद करून, तो माणगावला जोडल्याचे वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)