शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

कोलगाव दलितवस्तीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 14, 2016 23:41 IST

विहीर पडली कोरडी : पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी : कोलगाव दलित वस्तीमध्ये नळयोजना नसल्याने तेथील लोकवस्तीला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच तेथील विहीरही कोरडी पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरीचे खोदकाम करून नळयोजना करण्यासाठी निधी आठ दिवसात उपलब्ध करून द्यावा. अन्यथा कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दलितवस्तीतील ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. कोलगाव दलितवस्तीत सुमारे शंभर लोकवस्ती आहे. ही वस्ती गावाच्या उंचभागी असून, ग्रामपंचायत नळयोजनेची पाईप लाईन आमच्या वस्तीपर्यंत आलेली नाही. नळयोजनेचे पाणी आमच्या वस्तीपर्यंत येत नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर आमच्या वस्तीपासून बऱ्याच अंतरावर खोल भागात आहे. आमची वस्ती उंचावर असल्याने या विहिरीचे पाणी आम्ही पिण्यापासून सर्व गोष्टींसाठी वापरतो. पण ही विहीर डिसेंबरपासून कोरडी असल्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागते. आम्ही मागासवर्गीय असल्याने गावातील इतर लोक आम्हाला आपल्या विहिरीचे पाणी भरायला देत नाहीत. त्यामुळे आमची पाण्याविना गैरसोय होते. याची कल्पना वेळोवेळी ग्रामपंचायतीला दिलेली आहे. पण ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीला आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय करणार? याबाबत जानेवारी २०१६ मध्ये विचारणा केली असता, राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करून तुम्हाला पाणी मिळेल, असे सांगितले. या गोष्टीला आज चार ते पाच महिने पूर्ण झालेले आहेत. सध्या पाण्याविना आमचे फार हाल होत आहेत. आम्ही नाईलाजाने हे निवेदन आपल्याला देत आहोत. आमच्या पाण्याची सोय येत्या आठ दिवसांत न केल्यास ३० मे रोजी कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तन्वी सोनू कदम, यशोदा बाबुराव कदम, सुगंधा सुरेश जाधव, मयुरी लाडू जाधव, रवींद्र लवू जाधव, लक्ष्मी लवू जाधव आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.सध्या कोलगाव दलितवस्तीचा पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत असून वस्तीतील ग्रामस्थ पाण्यासाठी दाही दिशा फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पिण्याची सोय न केल्यास येत्या आठ दिवसात उपोषणाचा इशारा संबंधीत ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)पालकमंत्र्यांनी दिलेला निधी परत दलित वस्तीत असलेल्या विहिरीची खोदाई करून त्या विहिरीवर नळयोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विनंती केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या फंडातून निधीही उपलब्ध करून दिला. पण कोलगाव ग्रामपंचायतीने कोलगाव दलितवस्ती ही शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सामाविष्ट असल्याने शासनाच्या दुसऱ्या निधीतून पिण्याच्या पाण्याचे काम करता येणार नाही, असे सांगून मंजूर केलेला निधी परत केला.