शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोलगाव दलितवस्तीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 14, 2016 23:41 IST

विहीर पडली कोरडी : पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी : कोलगाव दलित वस्तीमध्ये नळयोजना नसल्याने तेथील लोकवस्तीला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच तेथील विहीरही कोरडी पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विहिरीचे खोदकाम करून नळयोजना करण्यासाठी निधी आठ दिवसात उपलब्ध करून द्यावा. अन्यथा कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दलितवस्तीतील ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. कोलगाव दलितवस्तीत सुमारे शंभर लोकवस्ती आहे. ही वस्ती गावाच्या उंचभागी असून, ग्रामपंचायत नळयोजनेची पाईप लाईन आमच्या वस्तीपर्यंत आलेली नाही. नळयोजनेचे पाणी आमच्या वस्तीपर्यंत येत नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर आमच्या वस्तीपासून बऱ्याच अंतरावर खोल भागात आहे. आमची वस्ती उंचावर असल्याने या विहिरीचे पाणी आम्ही पिण्यापासून सर्व गोष्टींसाठी वापरतो. पण ही विहीर डिसेंबरपासून कोरडी असल्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागते. आम्ही मागासवर्गीय असल्याने गावातील इतर लोक आम्हाला आपल्या विहिरीचे पाणी भरायला देत नाहीत. त्यामुळे आमची पाण्याविना गैरसोय होते. याची कल्पना वेळोवेळी ग्रामपंचायतीला दिलेली आहे. पण ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीला आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय करणार? याबाबत जानेवारी २०१६ मध्ये विचारणा केली असता, राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करून तुम्हाला पाणी मिळेल, असे सांगितले. या गोष्टीला आज चार ते पाच महिने पूर्ण झालेले आहेत. सध्या पाण्याविना आमचे फार हाल होत आहेत. आम्ही नाईलाजाने हे निवेदन आपल्याला देत आहोत. आमच्या पाण्याची सोय येत्या आठ दिवसांत न केल्यास ३० मे रोजी कोलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी कोलगाव सरपंचांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तन्वी सोनू कदम, यशोदा बाबुराव कदम, सुगंधा सुरेश जाधव, मयुरी लाडू जाधव, रवींद्र लवू जाधव, लक्ष्मी लवू जाधव आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.सध्या कोलगाव दलितवस्तीचा पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत असून वस्तीतील ग्रामस्थ पाण्यासाठी दाही दिशा फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पिण्याची सोय न केल्यास येत्या आठ दिवसात उपोषणाचा इशारा संबंधीत ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)पालकमंत्र्यांनी दिलेला निधी परत दलित वस्तीत असलेल्या विहिरीची खोदाई करून त्या विहिरीवर नळयोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विनंती केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या फंडातून निधीही उपलब्ध करून दिला. पण कोलगाव ग्रामपंचायतीने कोलगाव दलितवस्ती ही शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सामाविष्ट असल्याने शासनाच्या दुसऱ्या निधीतून पिण्याच्या पाण्याचे काम करता येणार नाही, असे सांगून मंजूर केलेला निधी परत केला.