शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे

By admin | Updated: October 30, 2015 22:38 IST

भालेकरांचा सल्ला : बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा कामावर लक्ष द्यावे

खारेपाटण : ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा पालकमंत्री केसरकरांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे’ असा सल्ला राष्ट्रीय कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भालेकर यांनी दिला आहे. आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पालकमंत्र्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भालेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी अशी बेताल वक्तव्य करण्याऐवजी आपले काम शिकून घेण्याचा प्रयत्न करावा, असा टोला भालेकर यांनी लगावला आहे. राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कामे सिंधुदुर्गात झाली. देशातील पहिला सी-वर्ल्ड प्रकल्प पर्यटनवृद्धीच्या हेतूने आपल्या जिल्ह्यात खेचून आणला, चिपी विमानतळाचे काम सुरू केले, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लावले. मात्र, आताचे पालकमंत्री सुडबुद्धीने वागत असून सी-वर्ल्ड प्रकल्प बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. राणे असताना या पदाला एक शोभा होती. एक वलय प्राप्त झाले होते. त्यांचा प्रशासनावर वचक होता. धाक होता. मात्र, या पालकमंत्र्यांना ‘मी पालकमंत्री बोलतोय’ अशी स्वत:ची ओळख अधिकारी व कर्मचारी यांना करून द्यावी लागते. याचा विचार अगोदर करावा. ज्या पक्षाच्या जिवावर त्यांना लाल दिवा मिळाला आहे, त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जे वेळ देऊ शक त नाहीत. ते सिंधुदुर्गच्या जनतेला काय वेळ देणार. खुद्द शिवसेनेतील जुने-जाणते शिवसैनिक केसरकरांच्या कुटनीतीला वैतागले असून, अनेक शिवसैनिक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून बंडाच्या पवित्र्यात आहेत. मंत्रिपदी बसून वर्षाचा काळ लोटत आल; परंतु केसरकरांना आपले दालन सोडावेसे वाटत नाही. ज्या गोरगरीब जनतेच्या मतांवर मंत्री बनले, त्यांना रस्ते, पाणी, आदी समस्या भेडसावत आहेत. हे केसरकरांना जिल्ह्यात आल्याशिवाय कसे जमणार. राणे कुटुंबावर नाहक टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम केसरकर जोरदार राबवत आहेत. मात्र, अशा कोणत्याही प्रकारची टीका राणेंचा सच्चा कार्यकर्ता सहन करणार नाही. सत्तेत राहूनदेखील वेळप्रसंगी राणे साहेबांनी आंदोलने केली, ती फक्त जनतेच्या हितासाठीच, असे पालकमंत्री केसरकर करू शकतील काय? राणेसाहेबांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय स्वत: घेणाऱ्या पालकमंत्री केसरकरांचा डाव सिंधुदुर्गातील स्वाभिमानी जनतेने ओळखला आहे. जनताच त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल. हे केसरकरांनी लक्षात ठेवावे, असे सडेतोड उत्तर भालेकर यांनी केसरकरांना दिले. (वार्ताहर)