शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

सर्वसामान्यांवरील विघ्नांना दूर सारण्यासाठीपोलिसांचा दिवस-रात्र पहारा

By admin | Updated: September 1, 2014 00:06 IST

गणेशभक्तांचा सलाम : खऱ्या संरक्षकांना धन्यवाद कोण देणार?

अजय लाड - सावंतवाडी -कोकणचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी जिल्हाभरात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होते. यामुळे छोटीमोठी भांडणे तसेच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. त्यावेळी आपणास आठवतात ते रस्त्याच्या कडेला ऊनापावसाचीही तमा न करता गणेशोत्सव कालावधीत समाजातील वाईट प्रवृत्तींना दूर ठेवत शांतता व शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी दिवसरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांची. तुमच्या आमच्यातील या पोलिसांनी जनसेवेचे व्रत स्वीकारलेले आहे. बाप्पाप्रमाणेच सर्वसामान्यांवरील विघ्नांना दूर सारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या या पोलिसांना सलाम.गणेश उत्सवात सर्वांचाच उत्साह व्दिगुणित झालेला असतो. गणेशाच्या तयारीपासून आगमनानंतर, त्याच्या विसर्जनापर्यंत सर्व घरातील वातावरण मंगलमय बनलेले असते. याचा प्रत्यय आपण सारे घेतच असतो. परंतु, समाजातील तुमच्या आमच्यातील एक घटक असलेले हे पोलीस बांधव मात्र, 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याप्रमाणेच सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे दिसतात. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेवेळी पोलीस झोपले होते का, अशा प्रतिक्रिया येतात. त्यांनाच टीका सहन करत टीकेचे धनी व्हावे लागते. असे असताना जर गणेशोत्सव वा अन्य सणासुदीच्या काळात त्यांच्या चांगल्या योग्य नियोजनबद्ध कार्यपद्धतीबाबत व चांगल्या कार्यक्षमतेबाबत चार कौतुकाचे शब्द याच समाजातील लोकांकडून का बाहेर पडत नाहीत, याचेही आश्चर्य वाटते. समाजाची हीच रीत आहे. कितीही चांगले काम केले तरीही वाईट घटनांवेळी ते सारे विसरले जाते. मात्र, कोकणच्या आराध्य देवतेचा हा उत्सव शांततेने व सुरक्षिततेत आपण या पोलिसांच्या पहाऱ्यामुळे साजरा करत आहोत. त्यांच्यामुळेच या उत्सवाचा पुरेपूर आनंद आपणा सर्वांना घेता येत आहे.सावंतवाडी शहरासह जिल्हाभरात पोलीस विभागातर्फे नियोजन करत शांतता व सुव्यवस्था राखण्यात यश प्राप्त केले आहे. लाखोंच्या घरात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह जिल्ह्यातील भक्तांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली असतानाही गाड्यांच्या पार्किंगपासून वाहतूक नियंत्रित करण्यात आली. आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवतानाच भाविकांच्या उत्साहावर पाणी पडणार नाही, यासाठी शांतता राखण्याचे कामही पोलिसांनी केले आहे. सावंतवाडी शहरातील पोलिसांसमवेत सुमारे ३७ होमगार्ड, २१ सायकींग फोर्सचे जवान, जिल्ह्याबाहेरील ९ पोलीस अधिकारी व राज्य वाहतूक नियंत्रण विभागातर्फे ६ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीही उत्सवाच्या कालावधीत दिवसरात्र पहारा देत समाजाची सेवा केली आहे.जिल्ह्यातील शांतता, सुरक्षा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दल करत आहे. गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी त्यांचेही मन कासावीस होत असते. परंतु, समाजसेवेतच देवाला शोधणाऱ्या या पोलिसांचे थोडेतरी उपकार समाजाने मानावेत. जेवणाखाण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नसतानाही कधीतरी बिस्कीट तर केव्हातरी वडापाव खाऊन समाजसेवेचे व्रत त्यांच्याकडून पाळले जात आहे.