शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे पाणी कोकणातच राहावे

By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST

दीपक सावंत : कोकणच्या पाण्यावरून सेनेची कोपरखळी

सावंतवाडी : कोकणचे पाणी पळविण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र, ती आमची नैसर्गिक देणगी आहे. कोकणातील पाणी कोकणातच राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्यात नेण्याची घोषणा केली होती. यावरून शिवसेनेने भाजपला कोकणच्या पाण्यावरून कोपरखळीच मारल्याची चर्चा सभागृहात होती.राज्याचे आरोग्यमंत्री शनिवारी सावंतवाडीतील आयोजित करण्यात आलेल्या काजू व कोको विकास निर्देशालय, भारत सरकार व कृषी पणन विभागाच्यावतीने आयोजित सेंद्रिय महोत्सव व काजू उत्पादन प्रशिक्षण वर्गात उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सेंद्रिय शेती धोरण मंत्रालय अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत, कृषी विभागाचे सहसंचालक एस. एल. जाधव, सभापती प्रमोद सावंत, सुचिता वजराठकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, आर. जी. पाठक यावेळी उपस्थित होते.आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, कोकणात भरपूर काही होऊ शकते, पण आज राज्याच्या विचार करता सर्वच ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर उपाय होणे गरजेचे असून, राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.कोकणाला निसर्गाने बरेच काही दिले असून, कोकणला पाणी हे निसर्गाने दिले आहे. पण, ते आपण साठवून ठेवू शकत नाही. आता त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. कोकणचे पाणी कोण तरी पळवण्याचा विचार करतात, त्यांना पाणी पळविण्यास देऊ नका. कोकणातील पाणी कोकणात राहायला द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.मध्यंतरी भाजपचे नेते तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्याला नेण्याची संकल्पना मांडली होती. त्यावर शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केलेली ही एकप्रकारची कोंडीच म्हणावी लागेल. कारण शिवसेना, भाजप हे राज्यात सत्तेत असून, कोकणच्या पाण्यावर मात्र वेगवेगळ्या भूमिका आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पेप्सी कंपनी सिंधुदुर्गमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असून योग्यप्रकारे त्यांना सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच शेतकरी माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श राहिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)