शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोकणचे पाणी कोकणातच राहावे

By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST

दीपक सावंत : कोकणच्या पाण्यावरून सेनेची कोपरखळी

सावंतवाडी : कोकणचे पाणी पळविण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र, ती आमची नैसर्गिक देणगी आहे. कोकणातील पाणी कोकणातच राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्यात नेण्याची घोषणा केली होती. यावरून शिवसेनेने भाजपला कोकणच्या पाण्यावरून कोपरखळीच मारल्याची चर्चा सभागृहात होती.राज्याचे आरोग्यमंत्री शनिवारी सावंतवाडीतील आयोजित करण्यात आलेल्या काजू व कोको विकास निर्देशालय, भारत सरकार व कृषी पणन विभागाच्यावतीने आयोजित सेंद्रिय महोत्सव व काजू उत्पादन प्रशिक्षण वर्गात उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सेंद्रिय शेती धोरण मंत्रालय अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत, कृषी विभागाचे सहसंचालक एस. एल. जाधव, सभापती प्रमोद सावंत, सुचिता वजराठकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, आर. जी. पाठक यावेळी उपस्थित होते.आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, कोकणात भरपूर काही होऊ शकते, पण आज राज्याच्या विचार करता सर्वच ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर उपाय होणे गरजेचे असून, राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.कोकणाला निसर्गाने बरेच काही दिले असून, कोकणला पाणी हे निसर्गाने दिले आहे. पण, ते आपण साठवून ठेवू शकत नाही. आता त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. कोकणचे पाणी कोण तरी पळवण्याचा विचार करतात, त्यांना पाणी पळविण्यास देऊ नका. कोकणातील पाणी कोकणात राहायला द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.मध्यंतरी भाजपचे नेते तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्याला नेण्याची संकल्पना मांडली होती. त्यावर शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केलेली ही एकप्रकारची कोंडीच म्हणावी लागेल. कारण शिवसेना, भाजप हे राज्यात सत्तेत असून, कोकणच्या पाण्यावर मात्र वेगवेगळ्या भूमिका आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पेप्सी कंपनी सिंधुदुर्गमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असून योग्यप्रकारे त्यांना सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच शेतकरी माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श राहिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)