शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

देऊलकरांचा वैचारिक पाया भक्कम ठेवू

By admin | Updated: March 11, 2017 20:34 IST

देवदत्त परुळेकर : जड अंत:करणाने उपस्थितांनी व्यक्त केल्या भावना

मालवण : समाजवादी नेते ज्ञानेश देऊलकर यांचे निधन झाले. यात कोणाचे गुरुजी गेले, कोणाचे मार्गदर्शक गेले अशा भावना त्यांनी घडविलेल्या शिलेदारांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्गाचे पालकत्व हरपल्याने जिल्ह्याची मोठी वैचारिक हानी झाली आहे. देऊलकर यांचा वैचारिक पाया नेहमीच भक्कम राहिल्याने त्यांच्या संस्कार व पुरोगामी विचारांची असलेली मजबूत सांगड जिवंत ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना अ‍ॅड. देवदत्त परुळेकर यांनी व्यक्त केली.ज्येष्ठ समाजवादी विचारवंत तसेच मच्छिमार नेते ज्ञानेश देऊलकर यांचे ७ मार्च रोजी निधन झाले. याबाबत शुक्रवारी मामा वरेरकर नाट्यगृह येथे नागरी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, नगरसेवक नितीन वाळके, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, सेजल परब, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दिगंबर सामंत, दिलीप घारे, छोटू सावजी, श्रीधर काळे, संजय वेतुरेकर, डॉ. सारंग कुलकर्णी, रविकिरण तोरसकर, ज्योती तोरसकर आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना देऊलकर यांची चित्रफीत व छायाचित्रे दाखविण्यात आली. ज्योती तोरसकर यांनी शोकपत्रांचे वाचन केले, तर शोकसभेचे सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले. गौरी सामंत यांच्या पसायदान गीताने श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी आम्हा मच्छिमारांचा आधारवड हरपला, अशा भावना मच्छिमार नेते व मान्यवरांनी जड अंत:करणाने व्यक्त केल्या. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी देऊलकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. उपस्थितांनी आपले विचार प्रकट करताना देऊलकर यांचे लाभलेले मार्गदर्शन व सहवासाचे वर्णन केले. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक ते मच्छिमार नेते या जीवन प्रवासात अनेक लढे उभारले. अभ्यासू मांडणी करत अनेक समस्यांना वाचा फोडली. पर्ससीन मासेमारी बंदी हा त्यांच्या लढ्याचा विजय आहे, असेही भावोद्गार व्यक्त करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शोकपत्रातून भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)महान व्यक्तीत ‘मी पणा’ नव्हता अ‍ॅड. परुळेकर म्हणाले, शिक्षकीपेशा सांभाळताना त्यांनी पांढरपेशा वर्गाशी नाते जोडले नाही. उलट समाजातील दुर्बल घटकाला आपलेसे केले. त्यांच्या एवढ्या महान कार्यात ‘मी पणाचा’ अहंकार नव्हता. त्यांचे विचार चिरकाल टिकविणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळी शिक्षक भारती परिषदेचे संजय वेतुरेकर यांनी देऊलकर यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केला जाईल, असे जाहीर केले.लढ्याचा शेवट विजयानेवैभव नाईक म्हणाले, राज्यपालांनी अभिभाषणात पर्ससीन बंदीमुळे मत्स्योत्पादनात वाढ झाली आहे, असे स्पष्ट केले. यात देऊलकर यांचे मोठे योगदान असून त्यांच्या लढ्याचा शेवट विजयाने झाला. डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, अंदमान ते मालवण या सागरी प्रवासात देऊलकर सरांचा मोठा वाटा आहे. पारंपरिक मच्छिमारांसाठी ते ऊर्जाशक्ति होते, असेही ते म्हणाले.