शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे ; सुशांत नाईक यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:09 IST

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे सुशांत नाईक यांचा आरोप'त्या' नगरसेवकांची आगपाखड़ का?नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार !

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत कायमच साटेलोटे असतात. यावर्षीची निविदाहि जादा दर दिलेल्या ठेकेदाराचीच मंजूर करण्यात आली होती. मात्र , ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.येथील विजय भवनमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, सुजीत जाधव, भुषण परुळेकर, अजित काणेकर,तेजस राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी सुशांत नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील कचरा उचलण्याची एक वर्षाच्या कालावधिसाठीची निविदा मे महिन्यात प्रसिध्द झाली होती. प्रति घर 195 रूपये असा जादा दर नमूद केलेल्या ठेकेदाराची निविदा मंजूर करुन त्याला ठेका देण्यात आला होता .तर कमी दराची म्हणजेच प्रति घर 145 रूपये दर नमूद केलेल्या दुसऱ्या ठेकेदाराची निविदा नामंजूर करण्यात आली होती.या निविदेबाबतचे सत्य शिवसेना नगरसेवकांच्यासमोर आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित जादा दराची निविदा रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्याना दिले. त्यामुळे जादा दराची निविदा रद्द करण्यात आली.त्यानंतर परत निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी कचरा उचलण्याची तीच निविदा प्रति घर 143 रूपये दराने त्याच ठेकेदाराने भरली. आणि ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा उचलण्याचा ठेका त्याला मिळाला आहे.कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या जागरूकपणामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांच्या दक्षतेमुळे कणकवली नगरपंचायतीचे म्हणजेच पर्यायाने शहरातील नागरिकांचे प्रति महीना 4 लाख रूपये वाचले आहेत. तसेच या निविदेपोटि जादा खर्च होणारे नगरपंचायतीचे वार्षिक 48 लाख रूपये वाचले आहेत. हे शिवसेना नगरसेवकांमुळेच घडले आहे.सध्या शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून दरदिवशी 50 टक्केच कचरा उचलला जातो. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. याबाबतही मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच नगरपंचायतीत पारदर्शक कारभारासाठी यापुढेही शिवसेना नगरसेवक कारभारावर बारकाईने लक्ष ठेवतील असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.'त्या' नगरसेवकांची आगपाखड़ का?दरवर्षी कणकवली शहरातील हा कचरा उचलण्याच्या ठेका एकाच ठेकेदाराला दिला जातो. तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. ही निविदा प्रक्रिया संगनमतानेच केली जाते.

 

याबाबत नगरपंचायत सभेत आम्ही मुद्दा उपस्थित केला असता त्यावेळी स्वाभिमानच्या नगरसेवकांनी आगपाखड केली होती. ती का करण्यात आली ? त्यामागचे नेमके गुपित काय? हे त्यांनी जनतेच्या समोर जाहिर करावे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी म्हणाले.नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार !कणकवली शहरातील नागरिकांशी आमची बांधीलकी आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर शिवसेनेचे नगरसेवक वचक ठेवण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने नागरिकांना चांगल्या सुविधा पूरवाव्यात यासाठी आमचा कायमच आग्रह रहाणार आहे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गpanchayat samitiपंचायत समिती