शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कणकवलीचे आमदार अनेक मु्द्यांवर अपयशी ठरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:17 IST

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे काम संदेश पारकर करत आहेत. जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी ...

ठळक मुद्देकणकवलीचे आमदार अनेक मु्द्यांवर अपयशी ठरले !प्रमोद जठार यांची टीका ; कणकवली येथे पत्रकार परिषद

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्याचे काम संदेश पारकर करत आहेत. जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे . केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित निधी देणारे सरकार असताना कणकवली मतदारसंघातील स्थानिक आमदारांनी योग्य पाठपुरावा न केल्यामुळे अनेक प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत. अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली .कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संदेश सावंत -पटेल, महेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प लोकांना नको असेल तर आमचाही विरोध असेल . परंतु प्रकल्प समन्वय समितीच्यावतीने दहा हजार एकर जमीन असलेल्या शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट तेवीस मे नंतर घेणार आहे. नाणार प्रकल्पला तेरा हजार एकर जमीन लागणार आहे . त्यामुळे दहा हजार एकर जमीन मिळाल्यास 70 टक्के जमीन शासनाकडे भूसंपादित होईल. त्यामुळे दीड लाख बेरोजगारांना नोकऱ्या देणारा हा प्रकल्प जनतेने स्वीकारल्यास कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होईल. असा विश्वास प्रमोद जठार यांनी यावेळी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत शासन सकारात्मक आहे . मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले आहे की, पहिल्यांदा प्रकल्प उभारणारी कंपनी निश्चित करा . कारण त्या कंपनीला अपेक्षित असलेले प्रश्न मार्गी लावता येथील . प्रकल्पासाठी जागा निश्चिती संबंधित कंपनी करेल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया शासन करेल. केवळ शासनाने जमीन भूसंपादन करून घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करू नये . त्या भूमिकेला माझा विरोध राहील. या गोष्टीचा विचार करता मालवण वायंगणी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाची जमीन अशास्त्रीय पद्धतीने ठरविण्यात आल्याची टीका प्रमोद जठार यांनी यावेळी केली.२३ मेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे देशात तीनशेपेक्षा अधिक खासदार निवडून येणार आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी सरकार येणार आहे. २२ मे पर्यंत विरोधक आमच्या विरोधात बोलत राहतील. मात्र , २३ मे रोजी त्यांची बोलती बंद होईल . रत्नागिरी मतदार संघातही युतीचाच खासदार मोठ्या मताधिक्याने जिंकेल.

मुंबईत काही प्रचार सभा मी घेतल्या होत्या . राज ठाकरेंनी मोदी सरकारला केलेल्या विरोधामुळे त्याचा फायदा युतीच्या उमेदवारांनाच होईल . मुळात मनसेने एवढा विरोध करून उमेदवार उभे न केल्यामुळे त्याचा लाभ शिवसेना -भाजपच्या उमेदवारांना होणार आहे .त्यामुळे राज्यात युतीचे ४० पेक्षा जास्त खासदार विजयी होतील. राज ठाकरेंच्या कृतीचा फायदा युतीला होऊन आम्ही चांगल्या जागा जिंकू . असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.राणेंनी स्वतः च्या स्वार्था पलीकडे काय केले ?राणे कुटुंबीयांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. सत्तेत राहून भाजपकडून खासदारकी मिळवली. तर स्थानिकांचे प्रश्न न सोडवता जनतेची दिशाभूल करण्याचेच काम आमदार नितेश राणे करत आहेत. कृषी पंप कंनेक्शन प्रलंबित आहेत. महामार्गाचा मोबदला न देता भूसंपादन प्रक्रिया केली जात आहे . कणकवली शहरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. वाहतूक कोंडीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत . आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे . मग केवळ आमदारकी काय उपयोगाची ? नारायण राणे यांच्याकडूनही दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर पहिल्यांदा त्यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाच्या वरिष्ठांकडे किंवा शासनाकडे आवाज उठवावा . त्यासाठी भाजप विरोधाची आणि सत्ता सोडण्याची भूमिका घ्यावी . असा टोला समीर नलावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदेश पारकर यांनी लगावला.ते म्हणाले, माझ्याशी गाठ आहे.असे सांगून प्रश्न मिटणार नाहीत. गल्लीतले प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत वजन वापरण्याची गरज आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची भूमिका राणे यांनी घ्यावी . जनतेची चेष्टा केलेली आम्ही सहन करणार नाही . महामार्ग संबधित प्रश्न न सुटल्यास पूर्ण काम बंद पाडू. असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग