शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कणकवलीत महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:44 IST

कणकवली : कणकवली शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे . तर पादचाऱ्यांनाही महामार्गावरून ...

ठळक मुद्देकणकवलीत महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त ! पादचाऱ्यांनाही महामार्गावरून चालणे अवघड

कणकवली : कणकवली शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे . तर पादचाऱ्यांनाही महामार्गावरून चालणे अवघड झाले आहे. या होणाऱ्या त्रासामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.गेले आठवडा भर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊन साचल्याने चिखल ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे . त्यामुळे या रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांसाठी अशक्य बनत आहे . पाऊस थांबल्यावर पाणी वाहून गेल्याने काहीसा दिलासा मिळत असला तरी पुन्हा पाऊस आल्यावर तशीच स्थिती निर्माण होत आहे.शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा गटारे नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबल्याने चिखल तयार होत आहे . येथे पादचाऱ्यांना चालणे अवघड होत आहे. सर्व्हिस रोड सुस्थितीत नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.रात्रीच्या वेळी वाहन चालकांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. या समस्येची दखल महामार्ग ठेकेदार कंपनीने वेळेत घ्यावी आणि काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग