शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:58 IST

कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकणकवलीत सहाव्या दिवशीही बंद, वाहनांची वर्दळ वाढलीअत्यावश्यक सेवेतील नागरिक पडले बाहेर

कणकवली : कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील नागरिक सेवा बजावण्यासाठी बाहेर पडल्याने काहीशी वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याचे चित्र आहे.कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक संघटना व नागरिकांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यामुळे कणकवली शहरातील नेहमीच गजबलेली बाजारपेठ ठप्प झाली आहे. कणकवली शहरात सरासरी २० ते २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. परंतु सध्या ही कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या दोन दिवसांपासून कमी होताना दिसत आहे.

तालुक्यातील आकडेवारीतही काहीशी घट झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी या जनता कर्फ्यू मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. तसेच सामाजिक संघटना व विविध पक्षाच्या नेत्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हा बंद यशस्वी झाला आहे.नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्व स्तरातील नागरीकांनी पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे २० सप्टेंबर पासून आतापर्यंत कणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे.अत्यावश्यक सेवेसाठी मेडिकले, दवाखाने सुरूकलमठ, जानवली, हळवल, वागदे, तळेरे, खारेपाटणसह कणकवलीमध्ये जनता कर्फ्यू आहे. या ठिकाणी बाजारपेठ बंद आहे. दूध व पेपर विक्री सकाळी ९ वाजेपर्यंत केली जाते. तर अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी मेडिकल व खासगी दवाखाने चालू ठेवण्यात आले आहेत. काही अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एसटी सेवा, बँका, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालये चालू आहेत. मात्र त्या ठिकाणी शुकशुकाट आहे. सोमवारपासून हे वातावरण पुन्हा सुरळीत होईल. त्याची वाट नागरिकांकडून पाहिली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग