शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कणकवली --विभागलेली मते कोणाला ?

By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST

विभागणारी मते कोणाच्या पारड्यात जातात त्यावर विजयाचे गणित अवलंबून

मिलिंद पारकर - कणकवली -विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून कणकवलीच्या जागेसाठी खरी लढत प्रमोद जठार आणि नीतेश राणे यांच्यात मानली जात आहे. यावेळी आघाडी आणि युती तुटली असून मागील निवडणुकीप्रमाणे विभागणारी मते कोणाच्या पारड्यात जातात त्यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रासाठी यावेळी ६९.४६ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये ७१.४३ टक्के मतदान झाले होते. १ लाख ४४ हजार ४८६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यावेळी १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सुमारे दहा हजार जास्तीचे मतदार आकडेवारीनुसार दिसत आहेत. मागील आणि आताच्या निवडणुकीत काही समान आणि काही वेगळे मुद्दे आहेत. भाजपाकडून आमदार प्रमोद जठार हेच यावेळी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावून पाहत आहेत. तुल्यबळ असलेला उमेदवार म्हणजे कॉँग्रेसचा उमेदवार आहे. रवींद्र फाटक यांच्या जागी आता नीतेश राणे उभे आहेत. मागील निवडणुकीत जठार आणि फाटक यांना जवळपास समान मते पडली. त्यावेळी कुलदीप पेडणेकर हे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार जनसुराज्य पक्षातून लढले आणि त्यांना २४,५६६ मते पडली होती. तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे कुलदीप पेडणेकर यांनी कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभव दाखवला. या मतांची विभागणी कशी होते यावर विजयाचे गणित अवलंबून राहिल. शिवसेनेची मते जरी अधिकृत उमेदवाराला गेली जी मागच्या निवडणुकीत जठार यांना मिळाली होती. तरी त्याचा जठारांना फटका बसू शकतो. आता विजय सावंत यांना कुलदीप पेडणेकर यांच्या जागी पाहिले जात आहे. सावंत यांनी जुन्या कॉँग्रेसच्या मतांना आपल्या बाजूने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसचा पारंपरिक मतदार हटत नसल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसते. यावेळी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार अतुल रावराणे यांच्या रूपाने उभा आहे. त्यांनाही कॉँग्रेसच्या उमेदवारासाठी संकट मानले जात आहे. मागील निवडणुकीतही काँटे की टक्कर पाहावयास मिळाली होती. यावेळीही युती आघाडीतील फुटाफुटी आणि बंडखोरीने असेच काहीसे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.