शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली --विभागलेली मते कोणाला ?

By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST

विभागणारी मते कोणाच्या पारड्यात जातात त्यावर विजयाचे गणित अवलंबून

मिलिंद पारकर - कणकवली -विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून कणकवलीच्या जागेसाठी खरी लढत प्रमोद जठार आणि नीतेश राणे यांच्यात मानली जात आहे. यावेळी आघाडी आणि युती तुटली असून मागील निवडणुकीप्रमाणे विभागणारी मते कोणाच्या पारड्यात जातात त्यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रासाठी यावेळी ६९.४६ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये ७१.४३ टक्के मतदान झाले होते. १ लाख ४४ हजार ४८६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यावेळी १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सुमारे दहा हजार जास्तीचे मतदार आकडेवारीनुसार दिसत आहेत. मागील आणि आताच्या निवडणुकीत काही समान आणि काही वेगळे मुद्दे आहेत. भाजपाकडून आमदार प्रमोद जठार हेच यावेळी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावून पाहत आहेत. तुल्यबळ असलेला उमेदवार म्हणजे कॉँग्रेसचा उमेदवार आहे. रवींद्र फाटक यांच्या जागी आता नीतेश राणे उभे आहेत. मागील निवडणुकीत जठार आणि फाटक यांना जवळपास समान मते पडली. त्यावेळी कुलदीप पेडणेकर हे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार जनसुराज्य पक्षातून लढले आणि त्यांना २४,५६६ मते पडली होती. तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे कुलदीप पेडणेकर यांनी कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभव दाखवला. या मतांची विभागणी कशी होते यावर विजयाचे गणित अवलंबून राहिल. शिवसेनेची मते जरी अधिकृत उमेदवाराला गेली जी मागच्या निवडणुकीत जठार यांना मिळाली होती. तरी त्याचा जठारांना फटका बसू शकतो. आता विजय सावंत यांना कुलदीप पेडणेकर यांच्या जागी पाहिले जात आहे. सावंत यांनी जुन्या कॉँग्रेसच्या मतांना आपल्या बाजूने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसचा पारंपरिक मतदार हटत नसल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसते. यावेळी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार अतुल रावराणे यांच्या रूपाने उभा आहे. त्यांनाही कॉँग्रेसच्या उमेदवारासाठी संकट मानले जात आहे. मागील निवडणुकीतही काँटे की टक्कर पाहावयास मिळाली होती. यावेळीही युती आघाडीतील फुटाफुटी आणि बंडखोरीने असेच काहीसे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.