शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची

By सुधीर राणे | Updated: May 22, 2025 15:49 IST

आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

कणकवली: कलमठमधील वीज समस्यांवरून ग्रामस्थ आज, गुरुवारी आक्रमक झाले. कणकवली येथील कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारण्यात आला. कनिष्ठ अभियंता बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. कलमठ गावातील विजे बाबतच्या विविध समस्यांबाबत सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांच्यासोबत चर्चा करताना कनिष्ठ अभियंता बोंगाळे यांना बोलावण्याची मागणी करण्यात आली. बोंगाळे येताच ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज समस्यांबाबत फोन लावला तरीही ते घेत नाहीत. ग्रामस्थांना योग्य उत्तर देत नाहीत. याबाबत आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. यावेळी बोंगाळे व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बगडे यांनी कनिष्ठ अभियंत्यांना नागरिकांशी सौजन्य पूर्ण वागण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी बोंगाळेंनी यापुढे जी कामे सांगितली जातील ती लेखी द्यावी. तोंडी कामे करणार नाही असे सांगताच आक्रमक ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दरम्यान, बगडे यांनी कलमठ मधील वीज समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आपण कार्यवाही करतो असे आश्वासन दिले. त्यानुसार प्रलंबित कामांची यादी तयार करण्यात आली. यात बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीमुळे कामावर हजर न होणाऱ्या रामू सांगवेकर यांना तातडीने हजर करून घेणे तसेच अन्य कामे प्राधान्याने आठ दिवसात करण्यात येतील असे आश्वासन यावेळी बगडे यांनी दिले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, महेश लाड, निसार शेख, नितीन पवार, अनुप वारंग, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांची भेट घेणार!कलमठ गाव अर्बनला जोडण्यात यावा. कनिष्ठ अभियंता बोंगळे अकार्यक्षम आहेत.विजेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी मार्ग काढावा. तीन दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित  होणे, म्हणजे महावितरण पाहिल्याच पावसात नापास झाल्यासारखे आहे. कलमठ वीज प्रश्नी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यात येईल. असे यावेळी संदीप मेस्त्री यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण