शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दीडशे एकरांतील काजूबाग खाक

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

भीषण आग : पंधरा हजार काजू कलमे, तीनशे आंबा कलमे जळाली; दीड कोटी रुपयांचे नुकसान

तळवडे : निरवडे-न्हावेली-पेंडूर सीमेवरील बागायतीस आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १५० एकरांतील काजू बागायतीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शेतकऱ्यांची पंधरा हजार काजू कलमे तसेच तीनशे आंबा कलमे जळाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आगीचे वृत्त कळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने मागवला. मात्र, ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, उशिरा घटनास्थळी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. निरवडे गावातील शेतकरी सुधीर मल्हार, सुनील मल्हार, बाबली मल्हार, विवेक मल्हार, चंद्रशेखर मल्हार, नंदा मल्हार, आरती मल्हार, रमाकांत मल्हार, नामदेव परब, लीलावती परब, सुहासिनी परब, रमाकांत मल्हार, सुरेश गोडकर, नामदेव मल्हार, विवेक मल्हार, आनंद परब, न्हावेली (पेंढऱ्याचीवाडी) गावातील शेतकरी विजय नाईक तसेच निरवडे व पेंडूर सीमेवरील ५० कुटुंबीयांच्या सुमारे १५० एकर जागेतील काजू बागायतीचे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अखेर तिन्ही गावांतील शेतकरी एकत्र आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी निरवडे तलाठी स्मिता परब यांच्यासह निरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत मल्हार व अन्य ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीची भरपाई अजून नाहीच...निरवडे गावात गेल्या वर्षी २०० ते २५० एकर जागेत आग लागली होती. यात शासनाने ८० लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला होता; परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आगीत शेतकऱ्यांची आंबा व काजू कलमे जळून भस्मसात झाली होती. एक वर्षानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या नुकसानीची पाहणी तहसीलदार, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री स्तरापर्यंत निवेदने दिली होती; परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीचा विमा उतरवण्यात आला नाही. विमा उतरविला, तरच आग, वादळ, पाऊस अशा नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते. अशी मोहीम शासनाने सिंधुुदुर्ग जिल्ह्यात अग्रक्रमाने राबविल्यास गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.