शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे एकरांतील काजूबाग खाक

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

भीषण आग : पंधरा हजार काजू कलमे, तीनशे आंबा कलमे जळाली; दीड कोटी रुपयांचे नुकसान

तळवडे : निरवडे-न्हावेली-पेंडूर सीमेवरील बागायतीस आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १५० एकरांतील काजू बागायतीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शेतकऱ्यांची पंधरा हजार काजू कलमे तसेच तीनशे आंबा कलमे जळाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आगीचे वृत्त कळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने मागवला. मात्र, ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, उशिरा घटनास्थळी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. निरवडे गावातील शेतकरी सुधीर मल्हार, सुनील मल्हार, बाबली मल्हार, विवेक मल्हार, चंद्रशेखर मल्हार, नंदा मल्हार, आरती मल्हार, रमाकांत मल्हार, नामदेव परब, लीलावती परब, सुहासिनी परब, रमाकांत मल्हार, सुरेश गोडकर, नामदेव मल्हार, विवेक मल्हार, आनंद परब, न्हावेली (पेंढऱ्याचीवाडी) गावातील शेतकरी विजय नाईक तसेच निरवडे व पेंडूर सीमेवरील ५० कुटुंबीयांच्या सुमारे १५० एकर जागेतील काजू बागायतीचे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अखेर तिन्ही गावांतील शेतकरी एकत्र आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी निरवडे तलाठी स्मिता परब यांच्यासह निरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत मल्हार व अन्य ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीची भरपाई अजून नाहीच...निरवडे गावात गेल्या वर्षी २०० ते २५० एकर जागेत आग लागली होती. यात शासनाने ८० लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला होता; परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आगीत शेतकऱ्यांची आंबा व काजू कलमे जळून भस्मसात झाली होती. एक वर्षानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या नुकसानीची पाहणी तहसीलदार, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री स्तरापर्यंत निवेदने दिली होती; परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीचा विमा उतरवण्यात आला नाही. विमा उतरविला, तरच आग, वादळ, पाऊस अशा नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते. अशी मोहीम शासनाने सिंधुुदुर्ग जिल्ह्यात अग्रक्रमाने राबविल्यास गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.