शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे एकरांतील काजूबाग खाक

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

भीषण आग : पंधरा हजार काजू कलमे, तीनशे आंबा कलमे जळाली; दीड कोटी रुपयांचे नुकसान

तळवडे : निरवडे-न्हावेली-पेंडूर सीमेवरील बागायतीस आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १५० एकरांतील काजू बागायतीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शेतकऱ्यांची पंधरा हजार काजू कलमे तसेच तीनशे आंबा कलमे जळाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आगीचे वृत्त कळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने मागवला. मात्र, ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, उशिरा घटनास्थळी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. निरवडे गावातील शेतकरी सुधीर मल्हार, सुनील मल्हार, बाबली मल्हार, विवेक मल्हार, चंद्रशेखर मल्हार, नंदा मल्हार, आरती मल्हार, रमाकांत मल्हार, नामदेव परब, लीलावती परब, सुहासिनी परब, रमाकांत मल्हार, सुरेश गोडकर, नामदेव मल्हार, विवेक मल्हार, आनंद परब, न्हावेली (पेंढऱ्याचीवाडी) गावातील शेतकरी विजय नाईक तसेच निरवडे व पेंडूर सीमेवरील ५० कुटुंबीयांच्या सुमारे १५० एकर जागेतील काजू बागायतीचे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अखेर तिन्ही गावांतील शेतकरी एकत्र आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी निरवडे तलाठी स्मिता परब यांच्यासह निरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत मल्हार व अन्य ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीची भरपाई अजून नाहीच...निरवडे गावात गेल्या वर्षी २०० ते २५० एकर जागेत आग लागली होती. यात शासनाने ८० लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला होता; परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आगीत शेतकऱ्यांची आंबा व काजू कलमे जळून भस्मसात झाली होती. एक वर्षानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या नुकसानीची पाहणी तहसीलदार, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री स्तरापर्यंत निवेदने दिली होती; परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीचा विमा उतरवण्यात आला नाही. विमा उतरविला, तरच आग, वादळ, पाऊस अशा नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते. अशी मोहीम शासनाने सिंधुुदुर्ग जिल्ह्यात अग्रक्रमाने राबविल्यास गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.