शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कडवई ‘पाणलोट’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: December 22, 2015 01:17 IST

संगमेश्वर तालुका : टक्केवारी मिळत नसल्याने कामे खोळंबली?

आरवली : पाणलोेट समिती सक्षम असतानाही कडवई येथील पाणलोट विकासकामांकडे कृषी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने पंचक्रोशीत कोणतेही ठोस विकासकाम होऊ शकले नसल्याची खंत पाणलोट सदस्यांनी व्यक्त केली. संगमेश्वर तालुक्यातील पाणलोट अधिकाऱ्यांना अपेक्षित टक्केवारी मिळत नसल्यानेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाणलोट समिती अध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी केला आहे.संगमेश्वर तालुक्यात कडवई पाणलोट समिती स्थापन झाल्यावर फार मोठा निधी विकासकामांसाठी मिळणार असल्याचा गाजावाजा ग्रामसभांमधून करण्यात आला. प्रत्यक्षात पाच वर्षात केवळ तीन बंधारे बांधण्यापलिकडे कोणतेही ठोस काम झालेले नाही. वैयक्तिक लाभार्थींचे आराखडे तयार करण्यापलिकडे कोणतीही प्रगती झालेली नाही. सुरुवातीच्या निधीतून आणलेली कृषी अवजारे अतिशय निकृष्ट दर्जाची होती, ती आता सडत पडली आहेत. याविरोधात अनेक ग्रामसभांमधून आवाज उठवूनही त्यावर पर्याय काढणे आजतागायत शक्य झालेले नाही. पाणलोटचे कृषी अधिकारी तर बंधाऱ्यांच्या कामाशिवाय कोणत्याही कामाकडे लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. बंधाऱ्यांच्या कामात सरळ सरळ ३० टक्के कमिशनची मागणी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या पाच वर्षात येथे येणारा कोणताही तालुका कृषी अधिकारी जास्त काळ टिकू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या होत असल्याने खाते बदल करण्यातच येथील पाणलोट सचिवांचा कालावधी वाया गेला, असा आरोप होत आहे. सिमेंटसाठी आगाऊ धनादेश देऊनही संबंधित कंपन्या सिमेंटचा पुरवठा करू शकलेल्या नाहीत. सिमेंटची कंपनी बदलल्यानंतर पाणलोट समितीला विश्वासात न घेता धनादेश परस्पर दुसऱ्या कंपनीला देण्यात आल्याचे समजते. स्थानिक बाजारपेठेतून कडवईतील पाणलोट समितीने ९५ हजारांचे सिमेंट कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशाने खरेदी केले. मात्र, सहा महिन्यांनंतर संबंधित कंपनीकडे असणारे पाणलोट समितीचे ९५ हजार रुपये कडवई पाणलोट समितीच्या खात्यात आजतागायत जमा होऊ शकले नाहीत. वेळ आल्यावर याबाबतचे सर्व पुरावे आपण सादर करू, असे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, याबाबत कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी व बेफिकीर वागण्यामुळेच कडवईतील विकासकामांना खीळ बसली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पाणलोट समिती अध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी केली आहे. (वार्ताहर)कृषी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बंधाऱ्याचे एकही काम पूर्ण झालेले नाही. सुरु कामांची रक्कम जबरदस्तीने परत घेण्यात आली. कृषी अधिकारी स्वत: ठेकेदार असल्यासारखे वागत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील अनेक बंधाऱ्यांची कामे कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला देऊन कमिशन कमी होणार नाही, याची काळजी घेण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केला आहे.