शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

फणसाचा टेम्पो उलटून नांदगावातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:49 IST

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर ...

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर शनिवारी रात्री ११.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिडयेवाडी (कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिडये रात्री ८ च्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी पाली-निवळी बावनदी या रस्त्याने हा टेम्पो जात होता. रात्री ११.४५ च्या दरम्यान निवळी-शेल्टेवाडी येथे रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यामुळे उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक मारला असता टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला. यामध्ये टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये बसलेले देवेंद्र आत्माराम बिडये (४५) व जयवंत कृष्णा बिडये (४१) हे जागीच ठार झाले.या टेम्पोतून प्रवास करणारे विठ्ठल विजय बिडये, लक्ष्मण नारायण बिडये, अश्विनी लक्ष्मण बिडये, अनिकेत लक्ष्मण बिडये, राजेश बाळकृष्ण तांबे (सर्व नांदगाव, बिडयेवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे व आतील फणसांचे नुकसान झाले आहे.कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाजयवंत यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी, तर देवेंद्र यांच्या पश्चात पत्नी आई, वडील व दोन मुली आहेत. दोघांच्याही घरच्या कर्त्या पुरुषांवरच काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.या दोघांचेही मृतदेह रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. नांदगाव येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांना शनिवारी रात्री अपघाताची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी या दोघांचेही मृतदेह नांदगाव येथे आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारनंतर नांदगावची संपूर्ण बाजारपेठ, सहा आसनी, मॅजिक रिक्षा बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.रुग्णवाहिका चालकामुळे उपचारअपघातावेळी घटनास्थळी जोरदार पाऊस होता. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना अपघाताची माहिती मिळाली. ते एवढ्या रात्री, भरपावसात तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले. तेथून जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली.