शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

फणसाचा टेम्पो उलटून नांदगावातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:49 IST

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर ...

पाली/तळेरे : वटपौर्णिमेसाठी भांडूप-मुंबईला फणस घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटून नांदगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील दोघेजण ठार झाले. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले आहेत. जयवंत कृष्णा बिडये (वय ४१) व देवेंद्र आत्माराम बिडये (४५, दोघेही रा. नांदगाव बिडयेवाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी असलेल्या पाली-निवळी बावनदी या रस्त्यावर शनिवारी रात्री ११.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-बिडयेवाडी (कणकवली) येथून आयशर टेम्पो (एमएच-०७-एक्स-१७९०) घेऊन चालक अनिकेत लक्ष्मण बिडये रात्री ८ च्या दरम्यान भिवंडी - मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. पाली येथे आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी पाली-निवळी बावनदी या रस्त्याने हा टेम्पो जात होता. रात्री ११.४५ च्या दरम्यान निवळी-शेल्टेवाडी येथे रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते. त्यामुळे उतारावरील अवघड वळणावर चालकाने ब्रेक मारला असता टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला. यामध्ये टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये बसलेले देवेंद्र आत्माराम बिडये (४५) व जयवंत कृष्णा बिडये (४१) हे जागीच ठार झाले.या टेम्पोतून प्रवास करणारे विठ्ठल विजय बिडये, लक्ष्मण नारायण बिडये, अश्विनी लक्ष्मण बिडये, अनिकेत लक्ष्मण बिडये, राजेश बाळकृष्ण तांबे (सर्व नांदगाव, बिडयेवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे व आतील फणसांचे नुकसान झाले आहे.कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाजयवंत यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी, तर देवेंद्र यांच्या पश्चात पत्नी आई, वडील व दोन मुली आहेत. दोघांच्याही घरच्या कर्त्या पुरुषांवरच काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.या दोघांचेही मृतदेह रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले होते. नांदगाव येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांना शनिवारी रात्री अपघाताची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी या दोघांचेही मृतदेह नांदगाव येथे आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी दुपारनंतर नांदगावची संपूर्ण बाजारपेठ, सहा आसनी, मॅजिक रिक्षा बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.रुग्णवाहिका चालकामुळे उपचारअपघातावेळी घटनास्थळी जोरदार पाऊस होता. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना अपघाताची माहिती मिळाली. ते एवढ्या रात्री, भरपावसात तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले. तेथून जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली.