शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

दोडामार्ग आमसभा गाजली : पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

दोडामार्ग : विरोधकांच्या आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर देण्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे दोडामार्गची शुक्रवारची आमसभा चांगलीच गाजली. आरोग्य, रस्ते आणि कृषी विभागाच्या प्रश्नावरून विरोधक काँगे्रस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तितक्याच आक्रमकतेने केसरकर यांनी उत्तरे दिली. काही प्रश्नांना आपण उत्तर देण्यास बांधील नसल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी विरोधकांना गप्प केले. विरोधकांच्या गोंधळाच्या वातावरणामुळे चिडलेल्या केसरकर यांनी अशी प्रवृत्ती कायम राहिल्यास पुढच्या आमसभेत पोलिसांची फौजच उभी करण्याचा इशारा दिला. एकंदरीत आजच्या आमसभेत विकासकामांबाबत ना सत्ताधाऱ्यांना आस ना विरोधकांना, फक्त सभेत कोण कोणावर बाजी मारतो यासाठी लागलेली चढाओढ प्रकर्षाने पहावयास मिळाली. दोडामार्गच्या ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दोडामार्गच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर होते. मात्र, प्रत्यक्षात कामावर नसल्याने एका निष्पाप जीवाचा वेळेवर उपचार न झाल्याने हकनाक बळी गेला. अशांवर कडक कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली. तर रुग्णालयातील अपूर्ण कर्मचारी वर्ग त्वरित भरण्यात यावा, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी मांडली. अखेर येत्या आठ दिवसात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नुकसान होत असल्याचे सज्जन धाऊसकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची सूचना करण्यात आली. मांगेली येथील धबधब्याजवळील वाहनतळावर शुल्क आकारण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्न उपस्थित करत ही जागा नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, याची माहिती मिळावी, असा मुद्दा विजय गवस यांनी मांडला. त्यावर पालकमंत्र्यांनी अहवाल देण्याची सूचना जिल्हा परिषद बांधकामच्या अधिकाऱ्यांना केली. तिलारी ते घोटगेवाडी रस्त्यावर खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस यांनी केली. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पैसे असताना खड्डे का बुजवले नाहीत, असा जाब विचारला. (प्रतिनिधी)आरोग्यावरून वादंगपंचायत समितीच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी आमसभा घेतली जाते. वर्षातून एकदा तरी आमसभा घेणे अपेक्षित असते. त्या अनुषंगाने दोडामार्गची आमसभा शुक्रवारी झाली. या आमसभेत विकासकामांबाबत चर्चा जास्त होईल आणि राजकीय हेव्यादाव्यांवर कमी, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तालुक्यातील विकासकामांवर फारच अल्प चर्चा झाली आणि जास्तीत जास्त वेळ गोंधळाच्या वातावरणातच गेला.