शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2024 16:55 IST

सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार 

सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला नौदल जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. कल्याण मधील जयदीप आपटे यांच्यापर्यंत नौदलाला कोणी नेऊन पोचवलं यांची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यापूर्वीच गुन्हे कसे दाखल झाले, यात काही तरी गौडबंगाल आहे असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौकशी समिती नेमायची असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन नाव ठरवा अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्याना सर्वसामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत.जबाबदारी झटकून चालणार नाही मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले, त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही अशी मागणी ही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समितीत नेमाया घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का,? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समिती नेमावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला हे जनतेने जाणून घ्यावे. हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.मंत्री केसरकरांच्या आश्वासनाचे काय झाले?मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात फक्त लोकांना आश्वासनेच दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रेल्वे टर्मिनसचे काय झाले ते त्यांनी सांगावे. आता जनताच त्यांना त्याची जागा दाखवून देईल. 

सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार सावंतवाडी मतदारसंघावर जरी उद्धव सेनेकडून दावा केला जात असला तरी आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीत सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार असून आमचे उमेदवार ठरले आहेत पण आताच घोषणा करणार नाही असे म्हणत अर्चना घारे-परब याच्याकडे अंगुली निर्देश केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकार