शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2024 16:55 IST

सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार 

सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला नौदल जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे. कल्याण मधील जयदीप आपटे यांच्यापर्यंत नौदलाला कोणी नेऊन पोचवलं यांची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यापूर्वीच गुन्हे कसे दाखल झाले, यात काही तरी गौडबंगाल आहे असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौकशी समिती नेमायची असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन नाव ठरवा अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्याना सर्वसामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत.जबाबदारी झटकून चालणार नाही मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले, त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही अशी मागणी ही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समितीत नेमाया घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का,? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते सांगतील त्यांनाच चौकशी समिती नेमावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला हे जनतेने जाणून घ्यावे. हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे अशी टीकाही पाटील यांनी केली.मंत्री केसरकरांच्या आश्वासनाचे काय झाले?मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात फक्त लोकांना आश्वासनेच दिली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रेल्वे टर्मिनसचे काय झाले ते त्यांनी सांगावे. आता जनताच त्यांना त्याची जागा दाखवून देईल. 

सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार सावंतवाडी मतदारसंघावर जरी उद्धव सेनेकडून दावा केला जात असला तरी आम्ही महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीत सावंतवाडीच्या जागेवर दावा करणार असून आमचे उमेदवार ठरले आहेत पण आताच घोषणा करणार नाही असे म्हणत अर्चना घारे-परब याच्याकडे अंगुली निर्देश केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकार