शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणा-या जयंत बरेगारांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 14:10 IST

सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे. या विरोधात वनविभागाने कठोर कारवाई करावी तसेच या विरोधात वनविभागाने न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी येथील सावंतवाडी वनविभागाच्या मुख्य कार्यालयासमोर शनिवारी सकाळ पासून उपोषण सुरू केले होते ते रात्री उशिरा मागे घेतले.यात जिल्हाधिकारी याच्या सोबत बैठक घेउन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन उपवनसंरक्षक चव्हाण यानी दिले तसेच बरेगार याच्याकडून आठवड्याची मुदत घेतले आहे तर बरेगार यानी वनविभागाने अवमान याचिका दाखल करावी अन्यथा वनविभागा विरोधात न्यायालयात जाईन असा इशारा दिला आहे.सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावांमध्ये बंदी क्षेत्र आहे. असे असतानाही या बंदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. मात्र येथील वनविभागाने न्यायालयाची दिशाभूल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीचा अहवाल मागितला तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितली, पण कोणतीही पाहाणी करण्यात आली नाही.येथील उपवनसंरक्षक सतत चुकीची माहिती देऊन लोकांची तसेच न्यायालयाची दिशाभूल करीत आहेत. या विरोधात सतत आवाज उठवला, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच आज हे उपोषण करीत आहे, असे जयंत बरेगार यांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी सकाळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी भेट दिली. मात्र बरेगार यांनी केलेली मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. तसेच हा विषय जिल्हाधिकारी यांच्या अख्यत्यारीत येत आहे, असे सांगितले.बरेगार यांनी उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अवमान याचिका केव्हा करणार हे आम्हाला लेखी द्या, अशी मागणी केली. पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण हे ओरोस येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीसाठी गेले होते ते रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले त्यानंतर चव्हाण यानी बरेगार याच्याशी सविस्तर चर्चा केली यात अवमान याचिकेचा विषय हा जिल्हाधिकारी याच्या संर्दभा येतो त्यामुळे तेथे बैठक घेउन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेउ असे सागत उपोषण करण्या बाबत विनती केली तसे लेखी पत्र ही बरेगार याना उपवनसंरक्षक यानी दिले त्यानंत बरेगार यानी आपले उपोषण मागे घेतले यावेळी कुडाळ व सावंतवाडी वनक्षेत्रपाल तसेच वन कर्मचारी उपस्थीत होते.लेखापालना लवकरच कार्यमुक्त करणार!बैठकस्थळी जयंत बरेगार यांनी लेखापाल संजय आंबेराय यांची बदली झाली, मग एक महिना त्यांना येथे का ठेवले, असा सवाल केला. त्यावर आपण त्यांना लवकरच सोडणार आहे, असे सांगितले. तसेच या मागण्या मान्य करा, मला लेखी द्या, मग मी माझे उपोषण मागे घेतो, असेही बरेगार यांनी चर्चेवेळी चव्हाण यांना सुनावले.