शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जन्मोजन्मी हिच पत्नी लाभू दे, पुरूषांकडून वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:53 IST

कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.

ठळक मुद्देजन्मोजन्मी हिच पत्नी लाभू दे, पुरूषांकडून वटपौर्णिमा साजरीकुडाळवासीयांचा सलग नवव्या वर्षी अनोखा उपक्रम

कुडाळ : कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गेली नऊ वर्षे पुरुष मंडळी एकत्र येत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करीत अनोखी प्रथा जोपासत आहेत. महिला जशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात तशीच प्रार्थना पुरुषांनी हीच पत्नी मिळावी यासाठी केली.

पत्नीला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थनाही पुरुषांनी केली. कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून आलेली पुरुषांची वटपौर्णिमा नऊ वर्षे पुरुष मंडळी वडाला फेऱ्या घालून साजरी करीत आहेत.यंदाही कोरोना या आजाराचे संकट घोंगावत असताना सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून उत्साहात महिलांप्रमाणेच पुरुषवर्गाने वटपौर्णिमा साजरी केली.उमेश गाळवणकर म्हणाले, स्त्रीच्या साथीशिवाय, तिच्या त्यागाशिवाय पुरुष आपली प्रगतीची वाट चोखाळू शकत नाही. ती समर्थपणे संसार सांभाळते म्हणूनच पुरुष आपले कर्तृत्व सिद्ध करु शकला आहे. तिच्या या योगदानाचा गौरव म्हणजेच हे पुरुषांच्या वटपौणिमेच्या सणाचे आयोजन होय. अशा सणांना सर्व समाजाची साथ असणे महत्त्वाचे आहे.याप्रसंगी बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज म्हणाले, ह्यस्वामी गौरवार्थ अमृतह्ण असं म्हणत संसार करणारी स्त्री पुरुषाच्या प्रति किती निष्ठावान असते. हे लक्षात घेऊन ती निष्ठा आणि तिच्याबद्दलचा श्रद्धाभाव अशा उपक्रमातून आपण हाती घेऊन तो वाढीस लावला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने समाजात असणारे स्त्री चे महत्त्व प्रतिपादन केले.यावेळी डॉ. व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, किरण करंदीकर, पांडुरंग पाटकर, प्रसाद परब, रोशन राऊळ, प्रसाद कानडे, प्रितम वालावलकर, किरण सावंत, संतोष पडते, सुरेश वरक, बळीराम जांभळे. प्रसाद राणे आदींसह अनेक पुरुष मंडळी उपस्थित होती. गेली ९ वर्षे उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये हा उपक्रम वटपौर्णिमेच्या दिवशी सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे.उमेश गाळवणकर यांच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर : निगुडकरडॉ. संजय निगुडकर म्हणाले, पुरुष आपली विविध क्षेत्रे स्वयंसिद्ध करत असताना स्त्रीची साथ महत्त्वाची असते. स्त्री जर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून वडाला फेऱ्या मारत असेल तर पुरुषांनी सुद्धा घरची जबाबदारी सांभाळून स्त्री समर्थपणे साथ देते म्हणून आपल्याला कार्य करायला मोकळीक मिळते हे लक्षात घेतले पाहिजे. अशी पत्नी जन्मोजन्मी आपल्याला सहचारिणी मिळावी यासाठी हे व्रत करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी नऊ वर्षांपूर्वी पुरुषांच्या वटपौर्णिमेचे लावलेले रोपटे आता दिवसेंदिवस भव्य रूप धारण करत आहे, हे आजच्या संसारामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीचे महत्त्व वाढत असल्याचे द्योतक आहे. समाजाने अशा उपक्रमाच्या पाठीशी राहून हे उपक्रम जास्तीत जास्त दूर देशी पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग