शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लघुपाटबंधारे योजनेतून सिंचनाचे नियोजन

By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST

नैसर्गिक अथवा तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यास उभे पीक जोपासण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील.

रत्नागिरी : कोकण विभागात शेतीचा हंगाम २०१४-१५साठी १५ डिसेंबर २०१४ ते १५ एप्रिल २०१५ या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील रांगव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना आणि साखरपा लघु पाटबंधारे योजनेतून कोंडगाव, साखरपा या संगमेश्वर तालुक्यातील प्रकल्पातील गावांना सिंंचनासाठी पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पाणीपुरवठा शक्यतो १५ डिसेंबरपासून करण्यात येईल. याअंतर्गत या योजनेचा समावेश क्षेत्रातील बागायतदारांनी पिकाचे पाणी मागणी अर्ज नमुना क्रमांक ७मध्ये पूर्ण करुन ३० नोव्हेंबर २०१४पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित सहाय्यक कार्यकारी अभियंता, शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावयाचा आहे. पाणी अर्जाचे कोरे नमुने त्याच कार्यालयात उपलब्ध होतील. या योजनेवरील लाभधारकांनी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाणी अर्जात काही दुरूस्ती असल्यास त्याची पूर्तता करुन स्वीकृत दिनांकाप्रमाणेच अर्ज सादर करून त्याची संबंधित कार्यालयाकडून पोच घ्यावी.प्राप्त सर्व अर्जांचा पाण्याच्या उपलब्ध साठ्यानुसार क्रमाने मंजुरीसाठी विचार केला जाईल. नैसर्गिक अथवा तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यास उभे पीक जोपासण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. त्यांनी स्वत: तशी तयारी ठेवावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानास लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने कळवले आहे. पाणी पुरवठ्यात तूट येऊ नये व पीक पूर्णत्त्वास येईपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या उद्देशाने शक्यतो १२० दिवसांच्या आत पूर्णत्त्वास येणाऱ्या मुदतीच्या पिकांची आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.पाणी अर्ज मंजूर झाल्याखेरीज पाणी घेऊ नये. पाणी अर्ज सादर केल्यानंतर नियमानुसार पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे. एकदा मंजूर केलेला पाणी अर्ज रद्द केला जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त पीक केल्यास त्या जादा क्षेत्रात दंडासह (हंगामी दराच्या तीनपट) पाणीपट्टी भरावी लागेल. पाणी वाया घालवल्यास पाणी नाश पंचनामा केला जाईल. पाटाचे पाणी शेवटून वर (टेल टू हेड) या शेतपातळीने घ्यावे लागेल. आकारणी १० गुंठ्याच्या पटीत व जास्तीत जास्त संपूर्ण क्षेत्रात केली जाईल. कालव्याची दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतरच व सिंंचनासाठी पाणी पुरवठा केला जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)रांगव प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना सिंचनासाठी पाणी.साखरपा योजनेतून कोंडगाव, साखरपा या गावांना सिंंचनासाठी पाणीपुरवठा.पाणी अर्जाचे कोरे नमुने सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात.