शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

लघुपाटबंधारे योजनेतून सिंचनाचे नियोजन

By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST

नैसर्गिक अथवा तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यास उभे पीक जोपासण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील.

रत्नागिरी : कोकण विभागात शेतीचा हंगाम २०१४-१५साठी १५ डिसेंबर २०१४ ते १५ एप्रिल २०१५ या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील रांगव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना आणि साखरपा लघु पाटबंधारे योजनेतून कोंडगाव, साखरपा या संगमेश्वर तालुक्यातील प्रकल्पातील गावांना सिंंचनासाठी पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पाणीपुरवठा शक्यतो १५ डिसेंबरपासून करण्यात येईल. याअंतर्गत या योजनेचा समावेश क्षेत्रातील बागायतदारांनी पिकाचे पाणी मागणी अर्ज नमुना क्रमांक ७मध्ये पूर्ण करुन ३० नोव्हेंबर २०१४पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित सहाय्यक कार्यकारी अभियंता, शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावयाचा आहे. पाणी अर्जाचे कोरे नमुने त्याच कार्यालयात उपलब्ध होतील. या योजनेवरील लाभधारकांनी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाणी अर्जात काही दुरूस्ती असल्यास त्याची पूर्तता करुन स्वीकृत दिनांकाप्रमाणेच अर्ज सादर करून त्याची संबंधित कार्यालयाकडून पोच घ्यावी.प्राप्त सर्व अर्जांचा पाण्याच्या उपलब्ध साठ्यानुसार क्रमाने मंजुरीसाठी विचार केला जाईल. नैसर्गिक अथवा तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यास उभे पीक जोपासण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. त्यांनी स्वत: तशी तयारी ठेवावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानास लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने कळवले आहे. पाणी पुरवठ्यात तूट येऊ नये व पीक पूर्णत्त्वास येईपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या उद्देशाने शक्यतो १२० दिवसांच्या आत पूर्णत्त्वास येणाऱ्या मुदतीच्या पिकांची आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.पाणी अर्ज मंजूर झाल्याखेरीज पाणी घेऊ नये. पाणी अर्ज सादर केल्यानंतर नियमानुसार पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे. एकदा मंजूर केलेला पाणी अर्ज रद्द केला जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त पीक केल्यास त्या जादा क्षेत्रात दंडासह (हंगामी दराच्या तीनपट) पाणीपट्टी भरावी लागेल. पाणी वाया घालवल्यास पाणी नाश पंचनामा केला जाईल. पाटाचे पाणी शेवटून वर (टेल टू हेड) या शेतपातळीने घ्यावे लागेल. आकारणी १० गुंठ्याच्या पटीत व जास्तीत जास्त संपूर्ण क्षेत्रात केली जाईल. कालव्याची दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतरच व सिंंचनासाठी पाणी पुरवठा केला जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)रांगव प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना सिंचनासाठी पाणी.साखरपा योजनेतून कोंडगाव, साखरपा या गावांना सिंंचनासाठी पाणीपुरवठा.पाणी अर्जाचे कोरे नमुने सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात.