शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार अधिकारी धडा घेणार का?

By admin | Updated: December 7, 2015 00:21 IST

कोनाळकट्टा पोस्टात दोनदा अपहार : पोस्टावरील जनसामान्यांच्या विश्वासाला तडा

गजानन बोंद्रे- साटेली भेडशी--ठेव ठेवण्यासाठी सर्वांत विश्वासार्ह्य म्हणून पोस्ट खात्याकडे पाहिले जाते; पण या विश्वासार्ह्यतेलाच दोडामार्गात तब्बल दोनदा अपहाराने तडा गेला आहे. दोनदा झालेल्या अपहारामुळे केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पोस्टावरच्या जनसामान्यांच्या आणि ठेवीदारांच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीड महिना सुरू असणाऱ्या चौकशी समितीच्या मंद कामकाजामुळे यातील केवळ एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे यातील मुख्य आरोपी कोण? आणि याविरोधात वरिष्ठ अधिकारी आतातरी येथील कारभाराबाबत धडा घेणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.कोनाळकट्टा कार्यालयातील पोस्टमन सुरेश बांदेकरने ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे पोस्टातील पैसे काढणे, भरणे यासाठी अनेक खातेदार हे पोस्टात जातच नसत. अशा अनेक खातेदारांचा व्यवहार सुरेश बांदेकरबरोबर कार्यालयाबाहेरही व्हायचा. आपला वेळ आणि त्रास वाचवण्याच्या उद्देशाने अनेक खातेदार कार्यालयात जात नसत. यामुळेच त्यांच्या पायावर कुऱ्हाड कोसळली अन् कोटीच्या अपहाराला हे ठेवीदार बळी पडले. सुरेश बांदेकरने सुरुवातीला दाखवलेला प्रामाणिकपणाच त्याच्या पथ्यावर पडत गेला. त्यामुळेच ठेवीदारांच्या रकमेच्या अपहारालाही चालना मिळत गेली. महिनाभरापूर्वी येथील मुसा नामक ठेवीदाराने आपल्या खात्यातील दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पोस्टाकडून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्याचवेळी पोस्टमन सुरेश बांदेकर हा गायब झाल्याने मुसा यांना शंका आली. त्यावेळी त्यांनी पोस्टात चौकशी केली असता, त्यांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले आणि या अपहार प्रकरणाचा उलगडा झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि खातेदारांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. पोस्ट कार्यालयात रोज मोठी गर्दी होऊ लागली. त्यावेळी तपासात अनेक ठेवीदारांच्या लाखोंच्या ठेवीच गायब झाल्याचे उघडकीस आले. यातील सर्व ठेवीदार गोरगरीब असून, त्यांना हा एक मोठा मानसिक धक्काच होता. अनेक ठेवीदारांना आपले अश्रू आवरत नव्हते. अनेकवेळा उपाशी राहून, पोटाला चिमटा काढून भविष्यासाठी राखून ठेवलेली संपूर्ण जीवनाची कमाईच गायब झाल्याने त्यांना बसलेला धक्का न पेलवणाराच होता. आमच्या बुडालेल्या ठेवी कोण देणार? आम्ही आता कसे जगावे? आम्हाला कोण आधार देईल? असे प्रश्न ते हतबल होऊन स्वत:ला विचारत होते. त्यामुुळे आता आपण संपलो, अशी भावनाही काही ठेवीदारांनी व्यक्त केली. मात्र, त्यावेळी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा ठेवीदारांना धीर देत पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले; पण त्यामध्येही सातत्य राहिल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे हे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. या अपहार प्रकरणी पोस्टाने सावंतवाडी येथील उपअधीक्षक इंगळे यांच्यासह चौकशी समिती नेमली. या समितीमार्फत खातेदारांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली. हळूहळू अपहाराच्या रकमेत वाढ होत गेली. त्यानंतर प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पोस्टाने निलंबित केले आणि खातेदारांचे पैसे महिनाभरात देण्याचे आश्वासन पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. ठेवीदारांच्या संघर्ष समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठेवीदारांना एकप्रकारे धीर मिळत होता, पण पोटाला चिमटा काढून जमवलेला पैसा त्यांच्या गरजेला मिळत नसल्याने हे खातेदार रोज पोस्टात चकरा मारत आहेत. त्यांच्या डोळ्यातील आसवे आता आटली आहेत; पण त्यांच्या मनाला बसलेला चटका मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. आज मिळतील, उद्या मिळतील अशा आशेवर हे ठेवीदार आपल्या रकमेकडे डोळे लावून आहेत. दरम्यान, स्थानिक समितीला हटवून बाह्य जिल्ह्यातील अधिकारी या चौकशीसाठी आणावेत, अशी मागणी ठेवीदार संघर्ष समितीकडून करण्यात आल्याने गुरुवारी रत्नागिरी आणि कोल्हापूर येथील अधिकारी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची रीतसर चौकशी करत ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा करण्यासाठी क्लेम फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे. पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रीतसर तक्रारीनुसार पोस्टमन बांदेकरला दोडामार्ग पोलिसांनी गोव्यातून अटक केली असता न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.पारदर्शी कारभाराचे आव्हानठेवीदारांच्या रकमा परत देण्याचे आश्वासन पोस्टामार्फत दिले जात आहे. मात्र, रक्कम हातात मिळेपर्यंत खातेदारांना धीर मिळणार नाही. त्यामुळे सद्य:परिस्थितीत तरी परिसरातील लोकांच्या पोस्ट खात्यावरील विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे पोस्ट खात्यावरचा विश्वास कायम राखायचा असेल, तर ठेवीदारांच्या रकमा या खात्याला संबंधित ठेवीदारांना लवकरात लवकर द्यावा लागतील. अन्यथा यापुढे कोणीही अशा कार्यालयांवर विश्वास ठेवणार नाही. दोनदा अपहार होऊनही या पोस्टातील कारभारावर अजूनही कोणाचा वचक राहिल्याचे निदर्शनास येत नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तरी यावरून धडा घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. शिवाय येथील पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच पोस्ट कार्यालयांचा कारभार पारदर्शी करण्याचे आव्हान पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.