शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

प्रकल्पग्रस्तांची बोळवणच

By admin | Updated: December 1, 2015 00:21 IST

महाजनको भरती : ३00 उमेदवारांमध्ये जिल्ह्यातील केवळ चौघांचा समावेश

शिरगाव : अवघ्या महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्पासाठी पन्नास वर्षापूर्वी शासनाला अल्प मोबदल्यात जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची पुन्हा महानिर्मिती कंपनीकडून बोळवण करण्यात आली आहे. राज्यभरात ३०० नव्या उमेदवारांची भरती करताना रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ चार जणांचीच वर्णी यामध्ये लागली आहे. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत.दोन दिवसापूर्वी जाहीर झालेल्या अंतीम यादीनंतर अनेक तरुणांनी भरती प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त केली. मुळातच गेली अनेक वर्ष तीच मशिनरी, तोच जलविद्युत प्रकल्प असताना पूर्वापार शासकीय तांत्रिक प्रशिक्षण व महाजनकोचे प्रशिक्षण यावरच उमेदवार घेतले जात होते. जर नवीन काहीच बदल नाहीत तर अनिश्चित अभ्यासक्रम आणि किचकट परीक्षा का ठेवण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावेळी निवड यादीत विदर्भ आणि मराठवाडा भागातील उमेदवारांचा जास्त भरणा दिसत असल्याने प्रकल्पग्रस्तांमधून या भरतीबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. सदर परीक्षेत पोफळी केंद्रातील ६० उमेदवारांपैकी केवळ चारच स्थानिक उमेदवार पास झाल्याने त्यांना पुन्हा परीक्षेला बसावे लागणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण दाखल्याच्या आधारे परीक्षा दिलेल्या उमेदवारांबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. साहजिकच संचालक मंडळाने दाखला जमा करा, ५ लाख एकदाच घ्या वा नोकरी हवी असेल तर १० हजारात करा तीही वयाच्या ५८ वर्षापर्यंतच असा प्रस्ताव ठेवल्यानंतर संभ्रमीत प्रशिक्षणार्थीना परीक्षेमधील निकालात प्रकल्पग्रस्तांचे बोळवण झाल्याची जाणीव झाल्याने हा विषय आता अधिकच गंभीर बनला आहे. महावितरण, एस. टी. महामंडळात तीन वर्ष कमी पगारात करारावर काम केलेल्या उमेदवारांना कायम होण्याची संधी मिळते. मात्र, महाजनकोमध्येच हा भेदभाव का? हाही प्रश्न यामुळे पुढे येत आहे. (वार्ताहर)रमेश बंगाल : आत्ताच परीक्षेचे नाटक कशासाठी?थेट सेवेत घेतलेल्या तरुणांनी आजवर सर्व तांत्रिक पातळीवर, प्रशासनिक सेवेत जबाबदारीने काम केले व ते निवृत्त झाले. आत्ताच हे परीक्षेचे नाटक काढून शासनाने व महाजनकोने प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य अंधारमय केले आहे. हे परीक्षेचे आत्ताच नाटक कशासाठी सुरू करण्यात आले.- रमेश बंगाल, माजी सरपंच (कोळकेवाडी), अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त समिती प्रकल्प्रस्तांवरअन्यायमहाजनकोच्या भरतीमध्ये प्रथमच परीक्षेची पद्धत अवलंबण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. प्रकल्पासाठी अल्प मोबदल्यात जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांवर यामुळे अन्याय केला जात असल्याची ओरड आता केली जात आहे.