शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

बागायतदारांना विमा

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : दीड हजार लोकांना मिळणार लाभ

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळपीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. १,६४४ बागायतदारांना विमा लाभांश मिळणार आहे.शासनाकडून फळपीक विमा योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत उच्चतम तापमान, कडाक्याची थंडी तसेच अवेळचा पाऊस आदी निकष जारी करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. शिवाय आॅक्टोबरमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस इतके तापमान काही ठिकाणी नोंदविण्यात आले. आंबा पिक विम्याचा कालावधी १ जानेवारीपासून सुरु होतो. फेब्रुवारी महिन्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तत्पूर्वी १,६४४ बागायतदारांनी जिल्ह्यातील १,५७३.८६ हेक्टरवरील आंबा बागांचा विमा उतरवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ९४ लाख २७ हजार ७०४ इतका प्रिमीअम भरला आहे. किनारपट्टीच्या १५ किलोमीटर आतील भागात ३७.५ अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून १५ किलोमीटर बाहेरील बाजूला ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाला विम्याचा लाभ मिळणार होता.जानेवारी ते मार्च ५ मि.मी. पेक्षा अधिक व मार्च ते ३१ मेपर्यंत १० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास लाभ मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार ७१८.३० हेक्टर आंबा आणि काजूचे ११ हजार ९६.४१ हेक्टर इतके नुकसान झाले आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांचे ३१ हजार ८१४.६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी १२ प्रमाणे ४९ कोटीचा निधी अपेक्षीत असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे. शासनाकडून नुकसान भरपाई अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हेक्टरी १२ हजार प्रमाणे निधी अपेक्षीत आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये फळपीक विमा योजना सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गतवर्षी उच्चतम तापमानामुळे काही बागायतदारांना लाभ मिळाला होता. परंतु किनारी भागातील उच्च तापमान न नोंदविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्याने विमा योजनेमुळे काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे बागायतदार चांगलाच वैतागला आहे. विम्याची भरपाईही वेळेत मिळत नसल्याची बोंब बागायतदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान झाल्याने बागायतदार सध्या मेटाकुटीस आले आहेत.