शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बागायतदारांना विमा

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : दीड हजार लोकांना मिळणार लाभ

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळपीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. १,६४४ बागायतदारांना विमा लाभांश मिळणार आहे.शासनाकडून फळपीक विमा योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत उच्चतम तापमान, कडाक्याची थंडी तसेच अवेळचा पाऊस आदी निकष जारी करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. शिवाय आॅक्टोबरमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस इतके तापमान काही ठिकाणी नोंदविण्यात आले. आंबा पिक विम्याचा कालावधी १ जानेवारीपासून सुरु होतो. फेब्रुवारी महिन्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तत्पूर्वी १,६४४ बागायतदारांनी जिल्ह्यातील १,५७३.८६ हेक्टरवरील आंबा बागांचा विमा उतरवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ९४ लाख २७ हजार ७०४ इतका प्रिमीअम भरला आहे. किनारपट्टीच्या १५ किलोमीटर आतील भागात ३७.५ अंश सेल्सिअस तर किनारपट्टीपासून १५ किलोमीटर बाहेरील बाजूला ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाला विम्याचा लाभ मिळणार होता.जानेवारी ते मार्च ५ मि.मी. पेक्षा अधिक व मार्च ते ३१ मेपर्यंत १० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास लाभ मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यात २० हजार ७१८.३० हेक्टर आंबा आणि काजूचे ११ हजार ९६.४१ हेक्टर इतके नुकसान झाले आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांचे ३१ हजार ८१४.६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी १२ प्रमाणे ४९ कोटीचा निधी अपेक्षीत असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे. शासनाकडून नुकसान भरपाई अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हेक्टरी १२ हजार प्रमाणे निधी अपेक्षीत आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये फळपीक विमा योजना सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गतवर्षी उच्चतम तापमानामुळे काही बागायतदारांना लाभ मिळाला होता. परंतु किनारी भागातील उच्च तापमान न नोंदविल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्याने विमा योजनेमुळे काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे बागायतदार चांगलाच वैतागला आहे. विम्याची भरपाईही वेळेत मिळत नसल्याची बोंब बागायतदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान झाल्याने बागायतदार सध्या मेटाकुटीस आले आहेत.