शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम’ फाऊंडेशनकडून आचरा खाडीची पाहणी

By admin | Updated: May 19, 2016 00:14 IST

लोकसहभागाची गरज : दिवाळीनंतर काम सुरू होण्याची शक्यता

आचरा : गाळाने भरलेल्या आचरा खाडीला ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ उपसा केल्यानंतर नवसंजीवनी मिळणार आहे. याबाबतचा सर्व्हे या फाऊंडेशनच्या तज्ज्ञ पथकाने रविवारी आचरावासीयांसोबत केला. या कामाला आता पावसाळा तोंडावर आल्याने दिवाळीनंतरच सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वी परबवाडी येथील खाडीवर पूल होण्याअगोदर या खाडीतून पडाव्यातून एक हजार पोत्यांची ने-आण केली जायची. होड्यांमधून वाहतूक होण्याएवढी खोली या खाडीची होती. वाढत्या वृक्षतोडीबरोबरच डोंगरमाथ्यावर होणारे यांत्रिकी आक्रमणामुळे खाड्या गाळाने बुजू लागल्या. यामुळे गाळ साचून खाड्यांची खोली कमी होऊ लागली. पारवाडीमुळे देवगड-आचरा वाहतुकीने खाडीतील होडी वाहतूकही बंद पडली. या खाडीत गाळ वाढत जाऊन बारमाही वाहणाऱ्या या नद्या पावसाळ्यापुरत्याच प्रवाही दिसू लागल्या. आचरा पारवाडी खाडी सध्या पूर्णपणे गाळाने भरल्याने खाडी किनाऱ्यावरील पोयरे, मुणगे कारिवणे, आचरा नागोचीवाडी, पारवाडी, जामडूल, डोंगरेवाडी, आदी भागांना धोका निर्माण झाला आहे. मोठ्या पावसात खाडीचे पाणी किनाऱ्याबाहेर पडून पूरसदृश स्थिती निर्माण होत होती. या अगोदरही १९९३ पासून हे भाग पावसाळी जोखीमग्रस्त म्हणूनच संबोधले जात आहेत. त्यातच मुणगे बाजूने या खाडीला पक्का सिमेंट बंधारा झाल्याने प्रवाह बदलून पारवाडी भागाला धोक्याची शक्यता अधिक वाढली होती. त्याबाबत गाळ उपसा, पारवाडी बाजूने बंधाऱ्यासाठी वारंवार अर्ज विनंत्या करत होते; पण त्याला यश मिळत नव्हते. यात पारवाडीचे समीर ठाकूर यांच्यासह इतर ग्रामस्थ पुढाकार घेत होते. पण त्यांची व्यथा आचरा भेटीला आलेल्या प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांना कळल्यावर त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून या खाडीचा गाळ उपसा करण्याचे ठरविले. यासाठी या गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी यांची बैठकही घेतल्याचे समजते. या फाऊंडेशनचे सचिव राजू सावंत तसेच इतरांनी पाहणी केल्यानंतर गेल्या रविवारी तज्ज्ञ पाच व्यक्तींचे पथक या खाडीच्या पाहणीसाठी पाठविले. यात कुमार नांगरे जाधव तसेच त्यांचे तीन सहकारी सहभागी झाले होते. या पथकासोबत पारवाडी ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष समीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये, वामन परब, कारिवणे येथील जोशी, आदी सहभागी झाले होते. या पथकाने पोयरे सीमेपासून आडबंदर भाटी जामडूल पिरावाडी नस्तापर्यंत पाहणी केल्याचे सांगण्यात आले.याबाबत माहिती देताना ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळाचे समीर ठाकूर यांनी सांगितले की, नाम फाऊंडेशनच्या तज्ज्ञ पथकाने रविवारी संपूर्ण खाडीपात्राचा सर्व्हे केला. काही ठिकाणी अडचणींवर मात करत ही पाहणी झाली. याबाबत तातडीने मशिनरी उपलब्ध झाल्यास पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू होईल; न पेक्षा दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम मोठ्या आर्थिक बजेटचे असून, नाम फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. या खाडीच्या गाळ उपशाने या भागातील सर्वांनाच त्याचा फायदा होणार असल्याने हे आपलेच काम आहे, यादृष्टीने लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. यासाठी काही अंशी आर्थिक सहकार्यही लागणार आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (वार्ताहर)