शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सावंतवाडीच्या जागेसाठी आग्रही

By admin | Updated: August 5, 2014 00:03 IST

भाजपाची मेळाव्यावेळी मागणी, उमेदवारांची भाऊगर्दी

ॉसावंतवाडी: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊ गर्दी झाली आहे. विधानसभा निरीक्षक जयप्रकाश ठाकूर यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुकांची यादी घेऊन लवकरच तीन उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे सावंतवाडीतून असून आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघाला भाजपची जागा मिळावी, असा दावा यावेळी करण्यात आला. येथील आदिनारायण मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी विधान सभा निरीक्षक जयप्रकाश ठाकूर, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नूतन जिल्हा उपाध्यक्ष हरिश पाटील, माजी आमदार अजित गोगटे, विद्या ठाकूर, संजय यादव, एस. टी. सावंत, विजय मराठे, राजन म्हापसेकर, शाम काणेकर, मंदार कल्याणकर, सीमा जंगले, राजू राऊळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ठाकूर म्हणाले की, वरिष्ठ पातळीवरून उमदेवार कोणताही दिला, तरी सर्व जणांना मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयाची अतिशयोक्ती न बाळगता विधानसभा निवडणूक एक जुटीने काम करणे आवश्यक आहे. विधान सभा निवडणुकीला मोदी लाट म्हणणे हे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीची स्थिती वेगळी आहे, असे मार्गदर्शन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. आमदार जठार म्हणाले, नारायण राणेंसारख्या दहशतवादी प्रवृत्तीचा पराभव २००९ साली कणकवली मतदार संघातून भाजपने केला होता. एवढी दहशत असूनही मी आमदारकी निवडणूक लढवून दाखविली होती. असा टोलाही जठार यांनी लगावला. (वार्ताहर)सावंतवाडीतून सर्वाधिक इच्छूक यावेळी ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांची यादी घेतली. यामध्ये कणकवली मतदार संघातून प्रमोद जठार, प्रमोद रावराणे, कुडाळ मतदार संघातून राजू राऊळ, बाबा मोंडकर, बब्रुवान भगत, गजा वेंगुर्लेकर, विलास हडकर, प्रभाकर सावंत, चारू देसाई, अभय सावंत, तर सावंतवाडी विधानसभेसाठी इच्छुक राजेंद्र म्हापसेकर, अतुल काळसेकर, सुषमा प्रभूखानोलकर, स्मिता आठलेकर, चंद्रशेखर देसाई, प्रकाश रेगे, संजय गावडे, शाम काणेकर, नेत्रा मोळीये, श्वेता कोरगावकर आदी इच्छुक आहेत. असे मिळून जिल्ह्यातून २० जण भाजपसाठी इच्छुक आहे. या सर्व इच्छुकांची यादी आज निरीक्षक जयप्रकाश ठाकूर यांनी घेतली आहे. जिल्ह्यातून विधान सभेसाठी तिन्ही उमेदवार हे भाजपचे मिळावे, असा दावा भाजपने या बैठकीत घातला आहे.क ोणी घर देता का? नारायण राणेंची स्थिती आता ‘कोणी घर देता का?’ अशी झाली आहे. त्यामुळे आता त्यांना मुंबई समुद्रात वेगळे बेट निर्माण करा आणि राज्य द्या, असा टोला जठार यांनी नारायण राणेंना लगावला. या बैठकीत तुळशीदास गावडे यांना युवा मोर्चा वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष पद जाहीर करण्यात आले.