शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

By admin | Updated: March 30, 2016 23:54 IST

रूपेश खाडये : मालाच्या प्रतवारीनुसार दर ठरविण्याची मागणी, नवीन लागवड होणे गरजेचे

कणकवली : सिंधुदुर्गात बांदा, दोडामार्ग, भेडशी येथील काजू बी मोठी व दर्जेदार असते. त्याला सध्या १२० रुपये व त्याच भागातील सेंद्रिय काजू १२३ रूपये दराने घेतला जातो. तर कुडाळ, कणकवली, मालवण, वैभववाडी, देवगड या भागातील काजू बी त्या मानाने दुय्यम दर्जाची असल्याने प्रतवारीने ११० ते ११३ रुपये दराने सध्या व्यापारी ते खरेदी करत आहेत. या सर्वच मालाला प्रतवारीनुसार दर देणे संयुक्तिक असताना बाजार समितीने जाहीर केलेला ११६ रुपये दर हा बांदा, दोडामार्ग या भागातील शेतकऱ्यांवर तर कणकवली भागातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. बाजार समितीने प्रतवारीच्या मालाच्या गुणवत्तेचा विचार करून दर जाहीर करणे गरजेचे आहे, असे काजू व्यापारी रूपेश खाडये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोणताही अभ्यास न करता समितीने हा निर्णय घेतला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी ११६ ११६ रूपये प्रतिकिलो दर द्यावा, असे समितीने ठरवले आहे. परंतु बाजारात येत असलेली काजू बी ही वेगवेगळ्या प्रतवारीनुसार येत असते. गेली कित्येक वर्षे आम्ही प्रतवारीनुसार दर निश्चित करून दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणजे मोठी काजू बी सध्या १२० ते १२५ रूपयेप्रमाणे घेतली जाते. तर मध्यम आकाराची ११० ते ११५ तर बारीक काजू १०० या प्रतवारीनुसार घेतला जातो. मात्र, बाजार समितीचे असे म्हणणे आहे की, बाजारात येणाऱ्या सर्वच मालाला ११६ रुपये दर द्यावा. कणकवलीतील शेतकऱ्यांना ११६ रूपये दर देणे बंधनकारक असले तरी हा माल व्यापाऱ्यांना ३ टक्के कमिशन, १.०५ टक्के बाजार समितीचा कर देऊन बाजार समितीने तत्काळ खरेदी करावा. खरेदी करताना तत्काळ रोख किंवा बॅँक आरटीजीएस पेमेंट देऊन खरेदी करण्याची व्यवस्था करावी. तर व्यापारी बांधव या समितीने घेतलेल्या निर्णयाला बांधील राहतील. तसेच सिंधुदुर्ग बाजार समिती गेली १७ वर्षे कर गोळा करत आहे. तरी एकाही तालुक्यात एकही मार्केट यार्ड, गोदाम इतर सुविधा पुरवू शकलेली नाही. पणन मंडळाचा ३ टक्के दराने कर्ज पुरवठा उपलब्ध असताना तोही पुरवठा करण्याचे सौजन्य दाखवले नाही.जगात कोणत्याही मालाला गुणवत्तेप्रमाणे दर दिला जातो. हे बाजार समितीने लक्षात घेऊन मगच दर घोषित करावा. कृषीखात्याने सुद्धा काजू बी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात काजू कलम देणे गरजेचे आहे. गेली दहा वर्षे काजू लागवड योजना बंद असल्याने लागवड कमी झाली आहे. तसेच काजू कलमांचे आयुष्य सरासरी २० वर्षेच असल्याने नवीन लागवड होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)काजू कलमे पुरवावीत४आफ्रिका खंडातील छोटे-छोटे देश लाखो टन काजू बी उत्पादित करून भारतात विक्री करत आहेत. कोकणात या महत्त्वाच्या पिकाची लागवड होण्यासाठी सामाजिक संघटना व सरकारने उदार धोरण ठेवून काजू कलमे पुरवावीत. ४ गेली आठ वर्षे शेतकऱ्यांना मी सुमारे ५ हजारांहून अधिक कलमे वाटली आहेत. बाजार समितीने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे खाडये यांनी म्हटले आहे.