शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

By admin | Updated: March 30, 2016 23:54 IST

रूपेश खाडये : मालाच्या प्रतवारीनुसार दर ठरविण्याची मागणी, नवीन लागवड होणे गरजेचे

कणकवली : सिंधुदुर्गात बांदा, दोडामार्ग, भेडशी येथील काजू बी मोठी व दर्जेदार असते. त्याला सध्या १२० रुपये व त्याच भागातील सेंद्रिय काजू १२३ रूपये दराने घेतला जातो. तर कुडाळ, कणकवली, मालवण, वैभववाडी, देवगड या भागातील काजू बी त्या मानाने दुय्यम दर्जाची असल्याने प्रतवारीने ११० ते ११३ रुपये दराने सध्या व्यापारी ते खरेदी करत आहेत. या सर्वच मालाला प्रतवारीनुसार दर देणे संयुक्तिक असताना बाजार समितीने जाहीर केलेला ११६ रुपये दर हा बांदा, दोडामार्ग या भागातील शेतकऱ्यांवर तर कणकवली भागातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. बाजार समितीने प्रतवारीच्या मालाच्या गुणवत्तेचा विचार करून दर जाहीर करणे गरजेचे आहे, असे काजू व्यापारी रूपेश खाडये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोणताही अभ्यास न करता समितीने हा निर्णय घेतला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी ११६ ११६ रूपये प्रतिकिलो दर द्यावा, असे समितीने ठरवले आहे. परंतु बाजारात येत असलेली काजू बी ही वेगवेगळ्या प्रतवारीनुसार येत असते. गेली कित्येक वर्षे आम्ही प्रतवारीनुसार दर निश्चित करून दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणजे मोठी काजू बी सध्या १२० ते १२५ रूपयेप्रमाणे घेतली जाते. तर मध्यम आकाराची ११० ते ११५ तर बारीक काजू १०० या प्रतवारीनुसार घेतला जातो. मात्र, बाजार समितीचे असे म्हणणे आहे की, बाजारात येणाऱ्या सर्वच मालाला ११६ रुपये दर द्यावा. कणकवलीतील शेतकऱ्यांना ११६ रूपये दर देणे बंधनकारक असले तरी हा माल व्यापाऱ्यांना ३ टक्के कमिशन, १.०५ टक्के बाजार समितीचा कर देऊन बाजार समितीने तत्काळ खरेदी करावा. खरेदी करताना तत्काळ रोख किंवा बॅँक आरटीजीएस पेमेंट देऊन खरेदी करण्याची व्यवस्था करावी. तर व्यापारी बांधव या समितीने घेतलेल्या निर्णयाला बांधील राहतील. तसेच सिंधुदुर्ग बाजार समिती गेली १७ वर्षे कर गोळा करत आहे. तरी एकाही तालुक्यात एकही मार्केट यार्ड, गोदाम इतर सुविधा पुरवू शकलेली नाही. पणन मंडळाचा ३ टक्के दराने कर्ज पुरवठा उपलब्ध असताना तोही पुरवठा करण्याचे सौजन्य दाखवले नाही.जगात कोणत्याही मालाला गुणवत्तेप्रमाणे दर दिला जातो. हे बाजार समितीने लक्षात घेऊन मगच दर घोषित करावा. कृषीखात्याने सुद्धा काजू बी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात काजू कलम देणे गरजेचे आहे. गेली दहा वर्षे काजू लागवड योजना बंद असल्याने लागवड कमी झाली आहे. तसेच काजू कलमांचे आयुष्य सरासरी २० वर्षेच असल्याने नवीन लागवड होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)काजू कलमे पुरवावीत४आफ्रिका खंडातील छोटे-छोटे देश लाखो टन काजू बी उत्पादित करून भारतात विक्री करत आहेत. कोकणात या महत्त्वाच्या पिकाची लागवड होण्यासाठी सामाजिक संघटना व सरकारने उदार धोरण ठेवून काजू कलमे पुरवावीत. ४ गेली आठ वर्षे शेतकऱ्यांना मी सुमारे ५ हजारांहून अधिक कलमे वाटली आहेत. बाजार समितीने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे खाडये यांनी म्हटले आहे.