शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काजू दर ठरविताना बाजार समितीकडून अन्याय

By admin | Updated: March 30, 2016 23:54 IST

रूपेश खाडये : मालाच्या प्रतवारीनुसार दर ठरविण्याची मागणी, नवीन लागवड होणे गरजेचे

कणकवली : सिंधुदुर्गात बांदा, दोडामार्ग, भेडशी येथील काजू बी मोठी व दर्जेदार असते. त्याला सध्या १२० रुपये व त्याच भागातील सेंद्रिय काजू १२३ रूपये दराने घेतला जातो. तर कुडाळ, कणकवली, मालवण, वैभववाडी, देवगड या भागातील काजू बी त्या मानाने दुय्यम दर्जाची असल्याने प्रतवारीने ११० ते ११३ रुपये दराने सध्या व्यापारी ते खरेदी करत आहेत. या सर्वच मालाला प्रतवारीनुसार दर देणे संयुक्तिक असताना बाजार समितीने जाहीर केलेला ११६ रुपये दर हा बांदा, दोडामार्ग या भागातील शेतकऱ्यांवर तर कणकवली भागातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. बाजार समितीने प्रतवारीच्या मालाच्या गुणवत्तेचा विचार करून दर जाहीर करणे गरजेचे आहे, असे काजू व्यापारी रूपेश खाडये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोणताही अभ्यास न करता समितीने हा निर्णय घेतला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी ११६ ११६ रूपये प्रतिकिलो दर द्यावा, असे समितीने ठरवले आहे. परंतु बाजारात येत असलेली काजू बी ही वेगवेगळ्या प्रतवारीनुसार येत असते. गेली कित्येक वर्षे आम्ही प्रतवारीनुसार दर निश्चित करून दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणजे मोठी काजू बी सध्या १२० ते १२५ रूपयेप्रमाणे घेतली जाते. तर मध्यम आकाराची ११० ते ११५ तर बारीक काजू १०० या प्रतवारीनुसार घेतला जातो. मात्र, बाजार समितीचे असे म्हणणे आहे की, बाजारात येणाऱ्या सर्वच मालाला ११६ रुपये दर द्यावा. कणकवलीतील शेतकऱ्यांना ११६ रूपये दर देणे बंधनकारक असले तरी हा माल व्यापाऱ्यांना ३ टक्के कमिशन, १.०५ टक्के बाजार समितीचा कर देऊन बाजार समितीने तत्काळ खरेदी करावा. खरेदी करताना तत्काळ रोख किंवा बॅँक आरटीजीएस पेमेंट देऊन खरेदी करण्याची व्यवस्था करावी. तर व्यापारी बांधव या समितीने घेतलेल्या निर्णयाला बांधील राहतील. तसेच सिंधुदुर्ग बाजार समिती गेली १७ वर्षे कर गोळा करत आहे. तरी एकाही तालुक्यात एकही मार्केट यार्ड, गोदाम इतर सुविधा पुरवू शकलेली नाही. पणन मंडळाचा ३ टक्के दराने कर्ज पुरवठा उपलब्ध असताना तोही पुरवठा करण्याचे सौजन्य दाखवले नाही.जगात कोणत्याही मालाला गुणवत्तेप्रमाणे दर दिला जातो. हे बाजार समितीने लक्षात घेऊन मगच दर घोषित करावा. कृषीखात्याने सुद्धा काजू बी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात काजू कलम देणे गरजेचे आहे. गेली दहा वर्षे काजू लागवड योजना बंद असल्याने लागवड कमी झाली आहे. तसेच काजू कलमांचे आयुष्य सरासरी २० वर्षेच असल्याने नवीन लागवड होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)काजू कलमे पुरवावीत४आफ्रिका खंडातील छोटे-छोटे देश लाखो टन काजू बी उत्पादित करून भारतात विक्री करत आहेत. कोकणात या महत्त्वाच्या पिकाची लागवड होण्यासाठी सामाजिक संघटना व सरकारने उदार धोरण ठेवून काजू कलमे पुरवावीत. ४ गेली आठ वर्षे शेतकऱ्यांना मी सुमारे ५ हजारांहून अधिक कलमे वाटली आहेत. बाजार समितीने याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे खाडये यांनी म्हटले आहे.