शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जलतरण स्पर्धेसाठी पर्यटन व्यावसायिकांचा पुढाकार, चिवला बीच येथील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:18 IST

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना गेली नऊ वर्षे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करीत असल्यामुळे चिवला बीच पर्यटनदृष्ट्या नावारुपाला आले आहे. राज्यासह देशातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असल्याने पर्यटन व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, यावर्षी दोन स्पर्धकांना जीव गमवावा लागल्यानंतर त्या दुर्घटनेचा बाऊ केला गेला.

ठळक मुद्देजलतरण स्पर्धेसाठी पर्यटन व्यावसायिकांचा पुढाकारजलतरण स्पर्धेमुळे चिवला बीच नावारुपाला चिवलावासीय सिंधुदुर्ग जलतरण संघटनेच्या पाठीशी

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना गेली नऊ वर्षे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करीत असल्यामुळे चिवला बीच पर्यटनदृष्ट्या नावारुपाला आले आहे. राज्यासह देशातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असल्याने पर्यटन व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, यावर्षी दोन स्पर्धकांना जीव गमवावा लागल्यानंतर त्या दुर्घटनेचा बाऊ केला गेला.

भविष्यात स्पर्धेसाठीच्या त्रुटी दूर करण्यासाठी आयोजकांना सहकार्य करून योग्य नियोजन करण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार तसेच सामाजिक संस्था पुढाकार घेतील, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक बाबा परब यांनी दिली.मालवण येथील हॉटेल सिल्वर सॅन्ड येथे पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार तसेच नागरिकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला सर्वांनी पूर्ण पाठींबा देताना आयोजकांच्या पाठीशी असल्याची भूमिका मांडली. यावेळी मंदार केणी, यतीन खोत, डॉ. राहुल पंतवालावलकर, भाई कासवकर, रूजाय फर्नांडिस, संतोष परब, फ्रान्सिस फर्नांडिस, अमू हर्डीकर, पावलू सोज, शरद जोशी, रोहित मेतर आदी उपस्थित होते.चिवला बीच येथे स्पर्धा घेणारे आयोजक हे मालवणचेच आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. जलतरण स्पर्धेमुळे भारतात चिवला बीच नावारुपाला आले आहे. हॉटेल व्यावसायिक, किल्ले दर्शन, जलक्रीडा तसेच मालवणी मेवा, मासळी खरेदी आदी व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल हंगाम नसताना होते. यावर्षी दोन स्पर्धकांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने आयोजकांवर टीका करून स्पर्धा बंद होण्याची मागणी केली जात होती.मात्र, चिवला बीच येथे जलतरण स्पर्धा व्हायलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे बाबा परब यांनी सांगितले.आयोजकांकडून स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. काही त्रुटी असल्यामुळे दोघा स्पर्धकांचा मृत्यू झाला. मात्र याच स्पर्धेत चार अंध व अनेक अपंग मुलांनी स्पर्धा यशस्वीपणे पार केली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी स्थानिकांच्या पुढाकारातून स्पर्धा व वाहतूक नियोजन केले जाईल.

स्पर्धेची व्यापकता पाहता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आयोजकांना सहकार्य करण्यात येईल, असे यतीन खोत यांनी सांगितले. आम्ही स्थानिक ग्रामस्थ स्पर्धा आयोजकांसोबत असून भविष्यातील स्पर्धेच्या नियोजनात सहभागी होऊन यावेळी झालेल्या चुकांची दुरूस्ती केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

विमा उतरविण्याबाबतही होणार विचारयावेळी मंदार केणी यांनी दुर्घटनेचा बाऊ करून राजकारण केले गेले. मात्र आता चिवला बीच येथील नागरिक स्पर्धा होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे संघटनेला कोणी बदनाम करू नये. पुढील वर्षी याचठिकाणी नियोजनबद्ध स्पर्धा होईल, असे त्यांनी सांगितले. तर डॉ. वालावलकर यांनी स्पर्धेदरम्यान सहभागी स्पर्धकांचा अपघाती विमा उतरविण्याबाबतही विचार केला जाईल असे सांगितले.

आयोजक स्पर्धेदरम्यान कोणतेही राजकारण करीत नाहीत. उलट सर्व राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाºयांना सन्मान देतात. त्यामुळे काही व्यक्तींकडून आयोजकांवर आकसाने होणारी टीका चुकीची आहे, असेही व्यावसायिकांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हावी!सागरी जलतरण क्रीडा प्रकाराला आॅलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळाले आहे. मालवणातून यशस्वी झालेले स्पर्धक भविष्यात भारतासाठी आॅलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करू शकणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या दहाव्या वर्षी स्पर्धेची व्यापकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जलतरण संघटनेकडे मागणी करण्यात येणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग