शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंची वाढती रजा संशयाला किनार देणारी....

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सावंतवाडी पंचायत समिती : तीन महिने रजेवर; चार वेळा रजा वाढविली;वादग्रस्त प्रकरणांनी तर्कवितर्क

राजन वर्धन -- सावंतवाडी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी गेल्या तीन महिन्यापासून अखंडित रजेवर आहेत. पंचायत समितीतील निघालेली भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि त्यांनी तब्बल चार वेळा वाढविलेली रजा संशयाला किनार देणार ठरत आहे. वारंवार रजेवर राहिल्याने पंचायत समितीच्या कारभारावर तालुक्यासह जिल्ह्यातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सावंतवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारीपदी सुमित कुमार पाटील ९ सप्टेंंबर २०१५ ला नियुक्त झाले. पाटील हे प्रोबेशनरी म्हणजे शिकाऊ कार्यकाळासाठी नियुक्त झाले होते. त्यांनी एक महिनाभर येथील कारभारात सुसूत्रताही आणली होती. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न तडीस नेण्याची मुख्य भूमिकाही त्यांनी बजावली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही त्यांना चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे येथील कारभार सुरळीत चालू होता. शिवाय येथील कामाचे प्रस्तावही नेटाने पुढे रेटले जायचे. वयाने तरुणतुर्क असल्याने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनासुद्धा पंचायत समितीतील कारभार काहीकाळ भावला होता. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पंचायत समितीमार्फत तालुक्यातील सर्व गावांच्या सहभागाने शहरात शोभयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये अनेक गावातून उत्स्फूर्त सहभागही घेण्यात आला. त्यामुळे ही शोभायात्रा चांगलीच गाजली. ही शोभायात्रा निघाली १७ आॅक्टोबरला व याची पूर्वतयारी म्हणून १३ रोजी बैठक घेण्यात येणार होती; पण त्यापूर्व तयारी बैठकीच्या अगोदरच्या दिवशीपासूनच कार्यरत बीडीओ सुमीत कुमार पाटील हे १२ आॅक्टोबरपासून रजेवर गेले. सुरुवातीला ते पंधरा दिवसांच्या रजेवर गेले; पंधरा दिवस म्हणता तीन महिने होत आले तरी ते आजतागायत कामावर रुजू झाले नाहीत. दरम्यान, पंचायत समितीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. काँग्रेसचे असणारे चार पंचायत समिती सदस्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निलंबित करण्यात आले, तर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत वेर्ले येथील शौचालय वाटपातील झालेला घोटाळाही बाहेर आला. याशिवाय वेर्ले ग्रामपंचायतीतील कारभाराबाबतही अनेक तक्रारी ग्रामस्थांसह ठरावीक ग्रामपंचायत सदस्यांमार्फत करण्यात आल्या. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनामार्फत एकच खळबळ माजली. याच दरम्यान, सहायक असणारे गटविकास अधिकारी मोहन भोई यांना बाहुले म्हणून गटविकास अधिकाऱ्यांच्या पदावर आरूढ करण्यात आले. भोई यांचा स्वभाव मितभाषी व सहनशील असल्याने त्यांनी साखळी पद्धतीने आलेल्या प्रशासकीय कामांचा निपटारा करण्यास सुरुवात केली. याचवेळी शिवसेनेसह विरोधी पंचायत समिती सदस्यांनी मासिक बैठकीत वेर्ले घोटाळ्याचा केलेला हल्लाबोल व निलंबित सदस्यांमुळे सत्ताधारी काँग्रेसचे अल्पमतात आलेले पदाधिकारी यामुुळे तर पंचायत समिती प्रशासनासह जिल्हा प्रशासनात एकच गोंधळ माजला. हा हल्लाकल्लोळ एकीकडे माजला असतानाच दुसरीकडे रजेवर गेलेले बीडीओ पाटील यांनी आपली रजा आणखीनच वाढवून घेतली. साहजिकच या सर्व कारभाराला सामोरे जाण्याची वेळ प्रभारी बीडीओ भोई यांच्यावर येऊन ठेपली व त्यांनी ती प्रामाणिकपणे पेललीही. वेर्ले प्रकरणात झालेला प्रथम दर्शनी भ्रष्टाचार आणि त्यामुळे येथील ग्रामसेवकाचे झालेले निलंबन यामुळे पंचायत समिती कारभारावर जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले. साहजिकच गटविकास अधिकारी पदावर प्रथमच आलेल्या पाटील यांना या प्र्रकरणाचा धसका बसणे साहजिक होते; पण खुद्द तेच रजेवर असल्याने हा सर्व प्रकार भोई यांच्या माथ्यावर पडला. पाटील यांनी आपली रजा वाढवून घेतली. सध्या मेडिकल रजेवर असल्याचे समजते, त्यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला दूरध्वनी अस्विकाराहर्य स्थितीत ठेवला होता. त्यामुळे ते जरी आजारी असले तरी पंचायत समितीच्या कारभारापासून अलिप्त राहिले, तर प्रभारी असणारे मोहन भोई यांच्यावर या सर्व प्रकाराचा डोलारा येऊन पडला. नवनियुक्त यांनी तब्बल चारवेळा आपली रजा वाढवून घेतली; पण त्यांच्या रजेने त्यांनी पंचायत समितीच्या कारभारातून आपली बाजू काढल्याच्या प्रतिक्रिया पंचायत समिती परिसरातून व्यक्त होत आहेत.एकंदरीत पाटील यांची वाढती रजा आणि पंचायत समितीतील विविध भ्रष्ट प्रकरणे बाहेर येण्याच्या प्रकाराने पंचायत समितीचा कारभार तालुक्यासह जिल्ह्यात चर्चिला जात आहे. तब्बल चार वेळा त्यांनी वाढवून घेतलेली रजा यामुळे ते पुन्हा परत येतील का नाहीत, अशी शंकाही निर्माण झाली आहे. सध्याचे नियुक्त गटविकास अधिकारी पाटील हे आॅक्टोबरपासून त्यांच्या वैयक्तिक पातळीवर रजेवर आहेत. ते नेमक्या कोणत्या कारणास्तव रजेवर आहेत याची कल्पना आपल्यालासुद्धा नाही. त्यामुळे ते नेमके कधी हजर होणार आहेत, याबद्दल वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. - मोहन भोई, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सावंतवाडी. प्रभारी पदाचा विक्रमसावंतवाडी पंचायत समितीची स्थापना १ मे १९८५ ला झाली आहे. कार्यालयात नोंद असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाच्या फलकानुसार पंचायत समितीत तब्बल २५ वेळा प्रभारी गटविकास अधिकारी पद कार्यरत राहिले आहे. यामुळे सांवतवाडी पंचायत समितीत गटविकास अधिकारीपद कायमस्वरूपी टिकत नसल्याचेच यावरून सिद्ध होते, असे म्हटले तर ते कुणी नाकारू शकणार नाही.