शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

रत्नागिरी विभागास २८ कोटीचे उत्पन्न

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

उन्हाळी हंगाम : दापोली, खेड, गुहागर, मंडणगड एस. टी. आगार नफ्यात

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागास उन्हाळी हंगामामध्ये २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ लाख २८ हजाराचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी नऊ आगारापैकी दापोली, खेड, गुहागर, मंडणगड आगारांनी ७५ लाख ५७ हजाराचा नफा मिळविला आहे. रत्नागिरी विभागाने उन्हाळी हंगामात ७८५ गाड्या सोडल्या होत्या. ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला होता. रत्नागिरी विभागातून दररोजच्या ग्रामीण भागातील तसेच लांब पल्याच्या गाड्या व्यतिरिक्त दररोज जादा गाड्या सोडण्यात येत होत्या. रत्नागिरी विभागातून २०१४ मध्ये १०९ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१३मध्ये २५ कोटी १५ लाख ३९ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. गेली तीन वर्षे महामंडळ फायद्यात आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. गतवर्षी ८१ लाख ८८ हजार किलोमीटर प्रवास झाला होता तर यावर्षी ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. यावर्षी दापोली आगाराने २४ लाख २३ हजार, खेड आगार १५ लाख ५ हजार, गुहागर आगारास ५ लाख २० हजार, मंडणगड आगारास ३० लाख ६४ हजार इतके जादा उत्पन्न मिळाले आहे. मात्र अन्य पाच आगाराना तोटा सोसावा लागला आहे. उर्वरित आगारांनी मात्र चांगली कमाई केली.(प्रतिनिधी)