शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

रत्नागिरी विभागास २८ कोटीचे उत्पन्न

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

उन्हाळी हंगाम : दापोली, खेड, गुहागर, मंडणगड एस. टी. आगार नफ्यात

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागास उन्हाळी हंगामामध्ये २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ लाख २८ हजाराचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी नऊ आगारापैकी दापोली, खेड, गुहागर, मंडणगड आगारांनी ७५ लाख ५७ हजाराचा नफा मिळविला आहे. रत्नागिरी विभागाने उन्हाळी हंगामात ७८५ गाड्या सोडल्या होत्या. ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला होता. रत्नागिरी विभागातून दररोजच्या ग्रामीण भागातील तसेच लांब पल्याच्या गाड्या व्यतिरिक्त दररोज जादा गाड्या सोडण्यात येत होत्या. रत्नागिरी विभागातून २०१४ मध्ये १०९ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१३मध्ये २५ कोटी १५ लाख ३९ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. गेली तीन वर्षे महामंडळ फायद्यात आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. गतवर्षी ८१ लाख ८८ हजार किलोमीटर प्रवास झाला होता तर यावर्षी ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. यावर्षी दापोली आगाराने २४ लाख २३ हजार, खेड आगार १५ लाख ५ हजार, गुहागर आगारास ५ लाख २० हजार, मंडणगड आगारास ३० लाख ६४ हजार इतके जादा उत्पन्न मिळाले आहे. मात्र अन्य पाच आगाराना तोटा सोसावा लागला आहे. उर्वरित आगारांनी मात्र चांगली कमाई केली.(प्रतिनिधी)