शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बस-ट्रकचा भीषण अपघात कामथे येथील घटना

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

सोळा प्रवासी गंभीर जखमी

  चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर कामथे वांगीपुलाजवळ आज (मंगळवारी) दुपारी १२.३० वाजता दुचाकीने ट्रकला हूल दिल्याने ट्रक थांबला. त्यामुळे मागून येणाऱ्या रत्नागिरी - चिपळूण (क्र. एमएच १४ बीटी २९७२) गाडीने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे एस. टी.तील प्रवाशांच्या तोंडाला, कपाळाला गंभीर जखमा झाल्या. १६ प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबई - गोवा महामार्गावर आज दुपारी वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. याच दरम्यान ऋषिकेश आंबवकर या सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला थांबविण्याच्या प्रयत्नात सावर्डेकडून चिपळूणकडे येणारा ट्रक अचानक थांबला. त्यामुळे मागून वेगात येणारी रत्नागिरी-चिपळूण गाडी ट्रकवर जोरात आदळली. त्यामुळे प्रवासी पुढे लोखंडी बारवर आदळले. या घटनेत काही प्रवाशांचे दात पडले, काहींच्या चेहऱ्याला जखमा झाल्या. काहींचे कपाळ फुटले आणि एकच आरडाओरडा झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी जखमींना रुग्णालयात आणले. बसमधील सीमा संभाजी कदम (२८, सातारा), सिद्धेश श्रीकृष्ण दळी (२०, घोणसरे), धोंडू म्हादू येलोंडे (६०, चिपळूण), संजय गणेश परांजपे (२५, गावखडी), विजय शंकर साळवी (६०), सुरेखा आत्माराम टाकळे (गोवळकोट), प्रिया प्रशांत पवार (२५, पोफळी), महेश गणपत माने (२६, चिपळूण), स्वराज स्वप्नील गुरव (२५, दाभिळ), कृष्णा लक्ष्मण गुरव (८०, दाभिळ), सुजित कानाल (२५, चिखली), दशरथ बाबू पावसकर (६७, पेठमाप, चिपळूण), विजया विजय मोरे (६५, भरणे), विशाल विजय मोरे (२४, भरणे), सुहास नथुराम झगडे (३५, मिरजोळी), माधवी चंद्रकांत लाड (१८, ढाकमोली) यांच्यासह अन्य प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर काहींना घरी सोडण्यात आले. ही गाडी व्ही. बी. ठसाळे चालवत होता, तर एम. जी. माने हे चालक होते. चालकही किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार आंबवकर हा जखमी झाल्याने त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय गमरे अधिक तपास करीत आहेत. अपघातातील काही रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

जखमींची परवड... चिपळूण - रत्नागिरी एस.टीचा १२.३० वाजता अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही ३ तास एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. वाहक माने याला रुग्णांच्या नातेवाईकांनी भांडावून सोडले होते. विविध प्रश्नांच्या सरबत्तीने तो हतबल झाला होता. मात्र, आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना सांगूनही ते दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे जखमींची परवड झाली. विभागीय वाहतूक नियंत्रकांनी याची दखल घ्यावी व एस.टी.चा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे.