शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

बस-ट्रकचा भीषण अपघात कामथे येथील घटना

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

सोळा प्रवासी गंभीर जखमी

  चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर कामथे वांगीपुलाजवळ आज (मंगळवारी) दुपारी १२.३० वाजता दुचाकीने ट्रकला हूल दिल्याने ट्रक थांबला. त्यामुळे मागून येणाऱ्या रत्नागिरी - चिपळूण (क्र. एमएच १४ बीटी २९७२) गाडीने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे एस. टी.तील प्रवाशांच्या तोंडाला, कपाळाला गंभीर जखमा झाल्या. १६ प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबई - गोवा महामार्गावर आज दुपारी वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. याच दरम्यान ऋषिकेश आंबवकर या सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला थांबविण्याच्या प्रयत्नात सावर्डेकडून चिपळूणकडे येणारा ट्रक अचानक थांबला. त्यामुळे मागून वेगात येणारी रत्नागिरी-चिपळूण गाडी ट्रकवर जोरात आदळली. त्यामुळे प्रवासी पुढे लोखंडी बारवर आदळले. या घटनेत काही प्रवाशांचे दात पडले, काहींच्या चेहऱ्याला जखमा झाल्या. काहींचे कपाळ फुटले आणि एकच आरडाओरडा झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी जखमींना रुग्णालयात आणले. बसमधील सीमा संभाजी कदम (२८, सातारा), सिद्धेश श्रीकृष्ण दळी (२०, घोणसरे), धोंडू म्हादू येलोंडे (६०, चिपळूण), संजय गणेश परांजपे (२५, गावखडी), विजय शंकर साळवी (६०), सुरेखा आत्माराम टाकळे (गोवळकोट), प्रिया प्रशांत पवार (२५, पोफळी), महेश गणपत माने (२६, चिपळूण), स्वराज स्वप्नील गुरव (२५, दाभिळ), कृष्णा लक्ष्मण गुरव (८०, दाभिळ), सुजित कानाल (२५, चिखली), दशरथ बाबू पावसकर (६७, पेठमाप, चिपळूण), विजया विजय मोरे (६५, भरणे), विशाल विजय मोरे (२४, भरणे), सुहास नथुराम झगडे (३५, मिरजोळी), माधवी चंद्रकांत लाड (१८, ढाकमोली) यांच्यासह अन्य प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर काहींना घरी सोडण्यात आले. ही गाडी व्ही. बी. ठसाळे चालवत होता, तर एम. जी. माने हे चालक होते. चालकही किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार आंबवकर हा जखमी झाल्याने त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय गमरे अधिक तपास करीत आहेत. अपघातातील काही रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

जखमींची परवड... चिपळूण - रत्नागिरी एस.टीचा १२.३० वाजता अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही ३ तास एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. वाहक माने याला रुग्णांच्या नातेवाईकांनी भांडावून सोडले होते. विविध प्रश्नांच्या सरबत्तीने तो हतबल झाला होता. मात्र, आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना सांगूनही ते दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे जखमींची परवड झाली. विभागीय वाहतूक नियंत्रकांनी याची दखल घ्यावी व एस.टी.चा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे.