शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन: प्रसाद लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:57 IST

रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या मिळणे अजून बाकी आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार ही अफवा आहे. या सर्व चाचण्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर येत्या दसरा किंवा दिवाळीच्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी माझ्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात हे स्पष्ट केले आहे. ...

रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या मिळणे अजून बाकी आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार ही अफवा आहे. या सर्व चाचण्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर येत्या दसरा किंवा दिवाळीच्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी माझ्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात हे स्पष्ट केले आहे. तसेच रत्नागिरीच्या विमानतळाचे उद्घाटन १ जानेवारी २०१९ पूर्वी करावे, हा आमचा आग्रह त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाबाबत बोलायचे तर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी हा विमानतळ होण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे प्रयत्न होते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर चिपी विमानतळ हे राज्याच्या अखत्यारित आणून राज्याच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उडान योजनेअंतर्गत चिपी व रत्नागिरी हे विमानतळ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊनच या विमानतळांचे उद्घाटन होईल, असे लाड म्हणाले. खासदार विनायक राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही घोषणा केल्या तरी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी सक्षम असेल तरच विमानतळ वा अन्य योजनांची अंमलबजावणी होऊ शकते, याबाबत आमदार लाड यांना विचारले असता ते म्हणाले, खासदारांबाबत मला आदर आहे; परंतु योजना आणण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सक्षम असावे लागतात. त्यांच्याकडे व्हिजन असावे लागते. निधीची तरतूद होऊनच योजना मार्गी लागते, याचा खासदार राऊत यांना विसर पडू नये.लवकरच विमानाच्या चाचण्यारत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. रत्नागिरी व चिपी विमानतळावर विमानाच्या चाचण्या होतील. त्याचा अहवाल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे जाईल. तेथून राज्य सरकारकडे अहवाल येईल. रत्नागिरीसाठी मुंबई-रत्नागिरी, पुणे-रत्नागिरी व दिल्ली-रत्नागिरी सेवा सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.कोल्हापूर विमानतळ आॅक्टोबरमध्ये सुरू!कोल्हापूर विमानतळही आॅक्टोबर २०१८च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. तेथे पहिल्या दिवसापासून इंडिगो व स्पाईसजेट या खासगी कंपन्यांची विमान सेवा सुरू होत आहे. या विमानतळाची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येथून कोल्हापूर -दिल्ली तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही विमानसेवा सुरू होऊ शकेल. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीचा फायदा रत्नागिरी व सिंधुदुर्गलाही होऊ शकेल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.