शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दिवाळीआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन: प्रसाद लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:57 IST

रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या मिळणे अजून बाकी आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार ही अफवा आहे. या सर्व चाचण्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर येत्या दसरा किंवा दिवाळीच्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी माझ्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात हे स्पष्ट केले आहे. ...

रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाबाबतच्या सर्व परवानग्या मिळणे अजून बाकी आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार ही अफवा आहे. या सर्व चाचण्या लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर येत्या दसरा किंवा दिवाळीच्याआधी चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी माझ्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात हे स्पष्ट केले आहे. तसेच रत्नागिरीच्या विमानतळाचे उद्घाटन १ जानेवारी २०१९ पूर्वी करावे, हा आमचा आग्रह त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाबाबत बोलायचे तर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी हा विमानतळ होण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे प्रयत्न होते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर चिपी विमानतळ हे राज्याच्या अखत्यारित आणून राज्याच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उडान योजनेअंतर्गत चिपी व रत्नागिरी हे विमानतळ होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊनच या विमानतळांचे उद्घाटन होईल, असे लाड म्हणाले. खासदार विनायक राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही घोषणा केल्या तरी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी सक्षम असेल तरच विमानतळ वा अन्य योजनांची अंमलबजावणी होऊ शकते, याबाबत आमदार लाड यांना विचारले असता ते म्हणाले, खासदारांबाबत मला आदर आहे; परंतु योजना आणण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सक्षम असावे लागतात. त्यांच्याकडे व्हिजन असावे लागते. निधीची तरतूद होऊनच योजना मार्गी लागते, याचा खासदार राऊत यांना विसर पडू नये.लवकरच विमानाच्या चाचण्यारत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. रत्नागिरी व चिपी विमानतळावर विमानाच्या चाचण्या होतील. त्याचा अहवाल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे जाईल. तेथून राज्य सरकारकडे अहवाल येईल. रत्नागिरीसाठी मुंबई-रत्नागिरी, पुणे-रत्नागिरी व दिल्ली-रत्नागिरी सेवा सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.कोल्हापूर विमानतळ आॅक्टोबरमध्ये सुरू!कोल्हापूर विमानतळही आॅक्टोबर २०१८च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. तेथे पहिल्या दिवसापासून इंडिगो व स्पाईसजेट या खासगी कंपन्यांची विमान सेवा सुरू होत आहे. या विमानतळाची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येथून कोल्हापूर -दिल्ली तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही विमानसेवा सुरू होऊ शकेल. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीचा फायदा रत्नागिरी व सिंधुदुर्गलाही होऊ शकेल, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.