शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आगामी निवडणुकीत जुमलेबाज सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 27, 2023 16:46 IST

जुमलेबाजीमुळेच त्यांना भीती वाटू लागली 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला हल्लाबोल चढवला. 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पक्षनिरीक्षक शेखर माने, महिला अध्यक्षा रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस ,दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आदी उपस्थित होते. मोदींनीच राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नसल्याचे सिद्ध केलेयावेळी बोलताना खासदार सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर जोरदार हल्ला चढविला. देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणजेच भ्रष्टाचारी पार्टी म्हणून हिणवले. पण त्याच मोदींना काहीच दिवसात याच पार्टीतील लोकांना सत्तेत सोबत घ्यावे लागले. यावरून जुमलेबाज मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करप्ट पार्टी नसल्याचे सिद्ध केले.जुमलेबाजीमुळेच त्यांना भीती वाटू लागली भाजपचेच सरकार हे भ्रष्ट आणि जुमलेबाज सरकार आहे. या जुमलेबाजीमुळेच त्यांना आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी प्रयत्न केले गेले. यांना मराठी माणूस मोठा झालेला नको आहे. बाळासाहेबांच्या पक्षाचं काय केलं? शरद पवारांच्या पक्षाचं काय केलं? दिल्लीत नितीन गडकरींच काय केलं? महाराष्ट्रात १०५ जण असताना देवेंद्र फडणविसांना उपमुख्यमंत्री केलं? आणि आणखीन एक उपमुख्यमंत्री आणून त्यांचं महत्वही कमी केलं. ही सगळी मराठी माणसंच आहेत‌. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि त्यामागे दिल्लीची अदृष्य शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे मराठी अस्मिता वाचवायची असेल तर या जुमलेबाज सरकारविरोधात लढा द्यावा लागेल आणि तो आम्ही लढू आणि जिंकूनही दाखवू असा विश्वासही व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSupriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदी