शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जन्मशताब्दी वर्षात बॅ. नाथ पै यांचा सन्मान; चिपी विमानतळाचे अखेर नामकरण 

By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2022 23:41 IST

सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन वर्षापूर्वीच सत्यात उतरले. बहुचर्चित अशा चिपी विमानतळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्यानेच झालेल्या चिपी विमान तळाला अखेर वेंगुर्लेच्या सुपुत्राचे अर्थात बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्याने बॅरिस्टर यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या कार्याचा एकप्रकारे हा सन्मानच म्हणावा लागेल तसेच सर्वाच पक्षांकडून होणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे.

सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन वर्षापूर्वीच सत्यात उतरले. बहुचर्चित अशा चिपी विमानतळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. त्याच कार्यक्रमात या विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेकांकडून करण्यात आली होती. तत्कालीन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही याला दुजोरा दिला होता.

बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

त्यामुळेच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते उमेश गाळवणकर यांनी ही चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे यासाठी राज्य सरकारकडे तसेच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सर्वच पक्षांकडून बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा आग्रह होता.त्यातच नव्या सरकार मध्ये उद्योग खाते हे उदय सामंत यांच्याकडे आल्याने त्यांनी या प्रस्तावाला चालना देत हा प्रस्ताव मंत्री मंडळा समोर आणला आणि त्याला मंत्री मंडळाची मंजूरी ही घेतली.

विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून या वर्षांत विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत असे असतना त्याच वर्षांत बॅ.नाथ पै याचा सन्मान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे संसदेतील कार्य हे अलौकिक असेच होते. बॅ.नाथ.पै यांची संसदेतील भाषणे ही चांगलीच गाजली होती. 

कोकणचा एक वेगळा ठसाच त्यांनी उमटवला होता. त्याच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बॅ.नाथ पै यांच्या कुटुंबाने ही जन्मशताब्दी चा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ला वेंगुर्ले येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच पूर्वी राज्य सरकारकडून चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देऊन एक प्रकारे सन्मानच केल्याचे म्हणावे लागेल. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग