शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

जन्मशताब्दी वर्षात बॅ. नाथ पै यांचा सन्मान; चिपी विमानतळाचे अखेर नामकरण 

By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2022 23:41 IST

सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन वर्षापूर्वीच सत्यात उतरले. बहुचर्चित अशा चिपी विमानतळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्यानेच झालेल्या चिपी विमान तळाला अखेर वेंगुर्लेच्या सुपुत्राचे अर्थात बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्याने बॅरिस्टर यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या कार्याचा एकप्रकारे हा सन्मानच म्हणावा लागेल तसेच सर्वाच पक्षांकडून होणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे.

सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन वर्षापूर्वीच सत्यात उतरले. बहुचर्चित अशा चिपी विमानतळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. त्याच कार्यक्रमात या विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेकांकडून करण्यात आली होती. तत्कालीन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही याला दुजोरा दिला होता.

बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

त्यामुळेच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते उमेश गाळवणकर यांनी ही चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे यासाठी राज्य सरकारकडे तसेच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सर्वच पक्षांकडून बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा आग्रह होता.त्यातच नव्या सरकार मध्ये उद्योग खाते हे उदय सामंत यांच्याकडे आल्याने त्यांनी या प्रस्तावाला चालना देत हा प्रस्ताव मंत्री मंडळा समोर आणला आणि त्याला मंत्री मंडळाची मंजूरी ही घेतली.

विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून या वर्षांत विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत असे असतना त्याच वर्षांत बॅ.नाथ पै याचा सन्मान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे संसदेतील कार्य हे अलौकिक असेच होते. बॅ.नाथ.पै यांची संसदेतील भाषणे ही चांगलीच गाजली होती. 

कोकणचा एक वेगळा ठसाच त्यांनी उमटवला होता. त्याच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बॅ.नाथ पै यांच्या कुटुंबाने ही जन्मशताब्दी चा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ला वेंगुर्ले येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच पूर्वी राज्य सरकारकडून चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देऊन एक प्रकारे सन्मानच केल्याचे म्हणावे लागेल. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग