शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

गंजलेल्या खांबांकडे वीज वितरणचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 7, 2014 00:36 IST

सावंतवाडीतील स्थिती : पावसाळ्यात संबंधित विभागाने सतर्कता बाळगणे आवश्यक

सावंतवाडी : धोकादायक झालेल्या विद्युत खांबांच्या दुरुस्तीकडे, बदलण्याकडे व झाडाझुडुपांनी वेढलेल्या विद्युत खांबांची साफसफाई करण्याकडे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सावंतवाडीत काही ठिकाणी दिसत आहे. जीर्ण झाल्याने धोकादायक बनलेल्या विद्युत खांबांमुळे हानी झाल्यास याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ घेईल का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. जीर्ण झालेले खांब बदलून योग्य ती काळजी घेत वीज वितरण मंडळाने सतर्कता बाळगावी, अशी मागणीही होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील काही ठिकाणचे विद्युत खांब हे जमिनीकडील बाजूने गंजलेले आहेत. यामुळे वीज खांब मोडकळीस आलेले आहेत. पावसाळ्यात महामंडळाचे लक्षावधीचे नुकसान ठरलेलेच असते. परंतु याला काहीअंशी विद्युत कंपनीही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विद्युत उपकरणांच्या जवळपास वाढलेल्या झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे तोडली जात नाहीत. जुने, जीर्ण, मोडकळीस आलेले धोकादायक खांब दुरुस्त करणे किंवा आवश्यक असल्यास बदलणे गरजेचे असते. परंतु खांब पूर्णपणे मोडून पडल्याशिवाय विद्युत महामंडळाला जाग येत नाही. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळेच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तुटलेल्या तारा न बदलता जुन्या तारांचे जोडकाम करून तात्पुरती गरज भागविली जाते. जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्यास त्यालाही जोडणी देत तारा बदलल्या जात नाहीत. यामुळे वीज गळतीत वाढ होते तसेच तारा तुटण्याचीही भीती नागरिकांच्या मनात राहते. पावसाळ्यात विद्युत कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत असतात. मात्र, अपघाताचा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारा, खांब आणि अन्य उपकरणांची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्युत खांब, तारा, उपकरणे यांच्याजवळ वाढलेली झाडे, वेली तोडून साफ केल्या पाहिजेत. जुने, जीर्ण खांब, तारा बदलणे गरजेचे आहे. महत्वाच्या विद्युत जनित्रांची दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागातील विद्युत खांबांचे व तारांचे सर्वेक्षण करण्यात यावे व तुटलेल्या तारा बदलण्यात याव्या व गंजलेले, मोडकळीस आलेले खांब बदलावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)समस्यांकडे डोळेझाकसावंतवाडीतील न्यू सबनीसवाडासह अन्य भागातील खांब जीर्ण झालेले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या खांबांवरही काही ठिकाणी वेलींनी घर केले आहे. यामुळे विद्युत पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या छोट्या छोट्या गोष्टींकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत राहिल्यानेच मोठी घटना घडते.