शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गंजलेल्या खांबांकडे वीज वितरणचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 7, 2014 00:36 IST

सावंतवाडीतील स्थिती : पावसाळ्यात संबंधित विभागाने सतर्कता बाळगणे आवश्यक

सावंतवाडी : धोकादायक झालेल्या विद्युत खांबांच्या दुरुस्तीकडे, बदलण्याकडे व झाडाझुडुपांनी वेढलेल्या विद्युत खांबांची साफसफाई करण्याकडे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सावंतवाडीत काही ठिकाणी दिसत आहे. जीर्ण झाल्याने धोकादायक बनलेल्या विद्युत खांबांमुळे हानी झाल्यास याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ घेईल का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. जीर्ण झालेले खांब बदलून योग्य ती काळजी घेत वीज वितरण मंडळाने सतर्कता बाळगावी, अशी मागणीही होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील काही ठिकाणचे विद्युत खांब हे जमिनीकडील बाजूने गंजलेले आहेत. यामुळे वीज खांब मोडकळीस आलेले आहेत. पावसाळ्यात महामंडळाचे लक्षावधीचे नुकसान ठरलेलेच असते. परंतु याला काहीअंशी विद्युत कंपनीही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विद्युत उपकरणांच्या जवळपास वाढलेल्या झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे तोडली जात नाहीत. जुने, जीर्ण, मोडकळीस आलेले धोकादायक खांब दुरुस्त करणे किंवा आवश्यक असल्यास बदलणे गरजेचे असते. परंतु खांब पूर्णपणे मोडून पडल्याशिवाय विद्युत महामंडळाला जाग येत नाही. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळेच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तुटलेल्या तारा न बदलता जुन्या तारांचे जोडकाम करून तात्पुरती गरज भागविली जाते. जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्यास त्यालाही जोडणी देत तारा बदलल्या जात नाहीत. यामुळे वीज गळतीत वाढ होते तसेच तारा तुटण्याचीही भीती नागरिकांच्या मनात राहते. पावसाळ्यात विद्युत कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत असतात. मात्र, अपघाताचा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारा, खांब आणि अन्य उपकरणांची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्युत खांब, तारा, उपकरणे यांच्याजवळ वाढलेली झाडे, वेली तोडून साफ केल्या पाहिजेत. जुने, जीर्ण खांब, तारा बदलणे गरजेचे आहे. महत्वाच्या विद्युत जनित्रांची दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागातील विद्युत खांबांचे व तारांचे सर्वेक्षण करण्यात यावे व तुटलेल्या तारा बदलण्यात याव्या व गंजलेले, मोडकळीस आलेले खांब बदलावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)समस्यांकडे डोळेझाकसावंतवाडीतील न्यू सबनीसवाडासह अन्य भागातील खांब जीर्ण झालेले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या खांबांवरही काही ठिकाणी वेलींनी घर केले आहे. यामुळे विद्युत पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या छोट्या छोट्या गोष्टींकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत राहिल्यानेच मोठी घटना घडते.