शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

गंजलेल्या खांबांकडे वीज वितरणचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 7, 2014 00:36 IST

सावंतवाडीतील स्थिती : पावसाळ्यात संबंधित विभागाने सतर्कता बाळगणे आवश्यक

सावंतवाडी : धोकादायक झालेल्या विद्युत खांबांच्या दुरुस्तीकडे, बदलण्याकडे व झाडाझुडुपांनी वेढलेल्या विद्युत खांबांची साफसफाई करण्याकडे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सावंतवाडीत काही ठिकाणी दिसत आहे. जीर्ण झाल्याने धोकादायक बनलेल्या विद्युत खांबांमुळे हानी झाल्यास याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ घेईल का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. जीर्ण झालेले खांब बदलून योग्य ती काळजी घेत वीज वितरण मंडळाने सतर्कता बाळगावी, अशी मागणीही होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील काही ठिकाणचे विद्युत खांब हे जमिनीकडील बाजूने गंजलेले आहेत. यामुळे वीज खांब मोडकळीस आलेले आहेत. पावसाळ्यात महामंडळाचे लक्षावधीचे नुकसान ठरलेलेच असते. परंतु याला काहीअंशी विद्युत कंपनीही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विद्युत उपकरणांच्या जवळपास वाढलेल्या झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे तोडली जात नाहीत. जुने, जीर्ण, मोडकळीस आलेले धोकादायक खांब दुरुस्त करणे किंवा आवश्यक असल्यास बदलणे गरजेचे असते. परंतु खांब पूर्णपणे मोडून पडल्याशिवाय विद्युत महामंडळाला जाग येत नाही. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळेच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तुटलेल्या तारा न बदलता जुन्या तारांचे जोडकाम करून तात्पुरती गरज भागविली जाते. जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्यास त्यालाही जोडणी देत तारा बदलल्या जात नाहीत. यामुळे वीज गळतीत वाढ होते तसेच तारा तुटण्याचीही भीती नागरिकांच्या मनात राहते. पावसाळ्यात विद्युत कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत असतात. मात्र, अपघाताचा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारा, खांब आणि अन्य उपकरणांची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्युत खांब, तारा, उपकरणे यांच्याजवळ वाढलेली झाडे, वेली तोडून साफ केल्या पाहिजेत. जुने, जीर्ण खांब, तारा बदलणे गरजेचे आहे. महत्वाच्या विद्युत जनित्रांची दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागातील विद्युत खांबांचे व तारांचे सर्वेक्षण करण्यात यावे व तुटलेल्या तारा बदलण्यात याव्या व गंजलेले, मोडकळीस आलेले खांब बदलावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)समस्यांकडे डोळेझाकसावंतवाडीतील न्यू सबनीसवाडासह अन्य भागातील खांब जीर्ण झालेले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या खांबांवरही काही ठिकाणी वेलींनी घर केले आहे. यामुळे विद्युत पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या छोट्या छोट्या गोष्टींकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत राहिल्यानेच मोठी घटना घडते.