शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 17, 2017 23:36 IST

व्यावसायिक दृष्ट्याही फायदेशीर : सगळी भीस्त सरकारी यंत्रणांवर, सामाजिक संस्थांसह नागरिक सुस्त

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीअभिमानाने वारसा सांगावा, अशी अनेक प्राचीन, ऐतिहासिक पर्यटनस्थळे रत्नागिरीच्या वाट्याला आली आहेत. पण, दुर्दैवाने सरकारी यंत्रणेवरच अवलंबून असलेल्या लोकांचे, सामाजिक संस्थांचे या सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष होत आहे. सांस्कृतिक ठेवा म्हणून ज्याचे जनत व्हायला हवे, अशी असंख्य पर्यटनस्थळे कोकणात असून, व्यावसायिक दृष्टीनेही त्याचा खूप मोठा उपयोग आहे. म्हणूनच त्याचे जतन होण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.सगळ्याच गोष्टी सरकारी यंत्रणांनी कराव्यात, अशी अपेक्षा केली जाते. जिथे मोठा खर्च अपेक्षित आहे, अशी पर्यटनस्थळे सरकारने विकसित करावीत, ही अपेक्षा रास्त. पण, या पर्यटन्स्थळांची परिपूर्ण माहिती जमवणे आणि पर्यटकांपर्यंत ती पोहोचवणे, ही पर्यटनस्थळे खराब होणार नाहीत, याची काळजी घेणे, या गोष्टी तरी सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेऊन करायला हव्या. जागतिक वारसा हक्क दिन साजरा करताना सर्वसामान्य माणसाने पुढे येणे अपेक्षित आहे.सह्याद्रीचे खोरे जपायलाच हवेसह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये वनसंपदा अधिक आहे. घनदाट वनसंपदेमुळेच प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य सह्याद्रीच्या खोऱ्यात पाहायला मिळते. परंतु जंगलतोडीमुळे संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा समावेश आहे. औषधी वनस्पतींचे फायदे कळू लागल्यामुळे या वनस्पतींचे महत्त्वदेखील वाढले आहे. परंतु या वनस्पती नेमक्या कोणत्या? याची ओळख होणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील बेसुमार वृक्षतोड थांबवून त्याचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. औषधी वनस्पतींची ओळख होईल शिवाय खोऱ्यातील पशू-पक्षी यांचीही ओळख पर्यटकांना होईल. एकूणच पर्यटनासाठी खोरे संवर्धित करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. प्राचीन काळापासून कोकणाला निसर्गसंपदा उपलब्ध झाली आहे. परंतु या निसर्गसंपदेचे जतन करण्यापेक्षा त्याच्या विनाशासाठीच अधिक प्रयत्न झाले. कोकणात पर्यटन वाढण्यासाठी सह्याद्रीचे खोरे जपणे आवश्यक आहे.स्वा. सावरकर यांची कोठडीस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी रत्नागिरी येथील विशेष कारागृहात दि. १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या कालावधीत बंदिवासात ठेवले होते. कारागृहातील ज्या खोलीत सावरकरांना ठेवण्यात आले होते ती कोठडी स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. या कोठडीत स्वातंत्र्यवीरांची स्मृती म्हणून भव्य तैलचित्र, सावरकरांच्या गळ्यात अडकविण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे संग्रहित करून ठेवण्यात आले आहेत.राजवाड्याची शान टिकायला हवीब्रम्हदेशाच्या थिबा राजाला १८८५ साली स्थानबध्द करून इंग्रजांनी रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी इंग्रज सरकारने १९१० साली तीन मजली राजवाडा बांधला. सन १९११मध्ये राजा राजवाड्यात राहण्यासाठी गेला. १०६ वर्षांची ऐतिहासिक वास्तू शहराचे भूषण आहे. राजवाड्याच्या गच्चीतून समुद्र दर्शन होते. पुरातन वास्तूच्या दुरूस्तीचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या राजवाडा दुरुस्तीच्या कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. राजवाडा परिसर विकासही रखडला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम तातडीने करणे गरजेचे आहे.